या कथेतील पात्र ही काल्पनिक आहेत याचा व्यक्तिशः
कोणाशी ही संबंध नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
शुभदा आणि भावना या दोघी ही अत्यंत जिवलग मैत्रिणी हॉस्टेलाच राहत होत्या. जिथे जातील तिथे एकत्रच दिसत असे, त्यांना एकमेकीं शिवाय करमत ही नसे. दोघी ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. वर्ष संपत आले होते, परीक्षा ही झाल्या होत्या. हॉस्टेल च्या नियमानुसार आता हॉस्टेल ची रूम खाली करायची होती.
आता आप आपल्या गावी परतण्याची तयारी सुरू झाली होती. भावनाला मात्र खुप वाईट वाटत होते काही महीने आता दोघी एकमेकींना भेटणार नाही म्हणून. जरा चिडचिड ही करत होती, शुभदा ने नेमके हेरले आणि तिला समजावू लागली, पण काही केल्या ती दुःखीचं होती. शुभदाने शेवटी शक्कल लढवली आणि तिला सांगितले, असे करूयात का?माझ्या बरोबर तूही चल ना माझ्या गावी तशी भावना ने आनंदाने मिठीच मारली. भावनाने आपल्या घरी फोन करून सांगितले की, मी शुभदा बरोबर तिच्या गावी जात आहे.
शुभदा ने आपल्या लहान भावाची सागर ची ओळख करून दिली. गाडीत दोघी ही कुजबुजत होत्या, शुभदा भावनाची मस्करी करत म्हणत होती, काय ग☺️ आवडला का?☺️ माझा भाऊ तुला, आणि भावना लाजुन तिला गप्प बैस म्हणत चिमटा काढत होती. एक तासाभरात ते त्यांच्या घरी पोहचले. घरात पोहचताच शुभदा ने आईला घट्ट मिठी मारली, तोपर्यंत सागर ने त्यांचे सामान त्यांच्या रूम मध्ये आणून दिले. दोघीही प्रवास करून खूप थकल्या होत्या. रात्रीचे जेवण करून दोघी ही त्यांच्या रूम मध्ये झोपी गेल्या.
खिडकीतून पडलेल्या उन्हाच्या किरणांनी दोघींना ही जाग आली. उठून त्यांनी हॉस्टेल ला जसे एकत्र अंघोळ करायच्या तसेच इथेही एकत्रच अंघोळ करून बाहेर आल्या.
या दोघींचे नाते बघून घरच्यांनाही ही नवल वाटत होते, जणू सख्या बहिणीच जाणवत होत्या. मस्त पैकी बऱ्याच दिवसांनी घरचा नाश्ता मिळाल्याने तृप्त होऊन दोघीनी ही खाल्ला. भावना लहानपणा पासून शहरातच लहानाची मोठी झाली होती, तिला गावाबद्दल नवल वाटत होते, आपल्याला पण गाव असावं गावी जावे असे नेहमीच वाटायचे, पण तिच्या आई वडिलांनी प्रेम विवाह केल्याने त्यांच्या गावाकडील लोकांनी संबंध न ठेवल्याने त्यांचा गावाशी कसलाच संबंध न्हवता.
भावना ला गाव बघायचे होते ती शुभदा च्या मागे लागली, चल ना आपण गाव फिरून येऊ तिने ही मान्य केले. आणि दोन ते तीन दिवस छान पैकी गावात फेरफटका मारून यायचे. तिच्या साठी हा अनुभव खूप नवीन होता. ते गावचे एक वैशिष्ट्य पूर्ण वातावरण तिला खूपच भावले होते. पुढच्या दिवशी भावना ने तिच्या आई कडून छान शी साडी नेसून तयार होऊन आली आणि तिच्या मागे लागली. आजमात्र शुभदा कंटाळली होती, ती टाळाटाळ करू लागली. तितक्यात सागर तिथे आला, शुभदा ने सागरला तयार केले की, भावना ला आपले शेत विहीर सार काही दाखव, आणि भावना ला त्याच्या बरोबर जायला सांगितले. असेही बघताच क्षणी सागर तिला व्यक्ती म्हणून छान आणि आवडला ही होता.
दोघे ही बाईक वरून निघाले आणि शेता जवळ येता बाईक लावून तिला शेत पायी पायी फिरवून दाखवू लावला. आज खऱ्या अर्थाने शेत कस असतं हे ती अनुभवत होती, सारकाही तिच्या करिता नाविन्यपूर्ण होते, आणि सागरला ती सारकाही कोणते पीक आहे?, कस लावतात?, काय करावे लागते?, नांगरणी म्हणजे काय? असे विचारत होती, आणि माहिती करून घेत होती. सागर ने ही यामधली तिची गोडी पाहून सर्व काही सांगितले. यामध्ये दुपार कधी झाली हे कळलेच नाही.
सागर आणि भावना यांच्या मध्ये छान मैत्री झाली होती. आता ते त्यांच्या शेतातल्या विहिरी जवळ होते. विहीर पाहून ती इतकी भारावून गेली की, तिचा तोल जाऊन विहिरीत पडणार, इतक्यात सागर ने तिला मागे ओढून सावरले या गडबडीत दोघे ही तिथेच असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर पडले. तिला सावरताना तिच्या साडीचा पदर निसटून ती त्याच्या अंगावर पडल्याने दोघे ही अशा अवस्थेत अती जवळ आले होते, मोहून टाकणारे अतीव सौंदर्याने सागर मोहित झाला होता, काही वेळ दोघांच्याही नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. काही क्षण जाता दोघे ही स्वतःला सावरत बाजूला झाले.
काही वेळ दोघे ही शांत होते, पुन्हा पूर्ववत होऊन दोघे गप्पा मारू लागले. अजून छान सा कोणता स्पॉट आहे का?, असे विचारता सागर ने हो.... आहे ना! पण जरा लांब आहे आपणास परतण्यास उशीर होईल असे सांगितले. हे ऐकून भावना ने त्याला विनंती केली की, चल ना..... दाखव तो स्पॉट. तिच्या लाघवी बोलण्याला तो नकार देऊच शकला नाही. लगेचच ते त्या जागी जाण्याकरिता निघाले, पोहचेपर्यंत चार वाजले होते, तो टेकडी सारखा भाग आणि सपाट पठार होते, आणि एक पडीक असे झोपडे.. त्याला झोपडी पण म्हणता येणार नाही अशी पडीक जागा होती. त्या पठारावरून अतिशय सुंदर नजारा दिसत होता, अप्रतिम असे दृश्य सारे होते. तिने सागरचे या करिता खूप आभार मानले.
अचानक वातावरण एकदम बदलेले आणि पावसाची चिन्ह दिसू लागली. सागर लगेच निघायची घाई करू लागला, पण ते नयनरम्य नजारा पाहून मंत्रमुग्ध झालेली भावना तेथून निघायचे नावच घेत न्हवती. सागरला ज्याची भीती होती तेच घडले, पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र भावना जागी झाली आणि दोघांनाही काय करावे सुचत न्हवते. काही अंतरावर असलेल्या त्या पडीक घरात पळत गेले, मात्र तोपर्यंत दोघे ही पुरते भिजले होते. तिकडे घरी सगळे काळजीत होते दोघे कुठे आणि कसे आहेत इतका वेळ का झाला?
इकडे दोघेही चिंब भिजले होते, त्यात भावना ने साडी नेसली होती, त्या चिंब भिजलेल्या साडीत भावना चे आखिव रेखीव शरीर उठावदार दिसत होते, त्यात मुळात ती खूप सुंदर होतीच. सागर तिच्या या सौंदर्या कडे पहातच राहिला, भावना मात्र लाजून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण चिंब भिजलेल्या अवस्थेमुळे ते तिला शक्य होत न्हवते. सागरच्या ही गोष्ट लक्ष्यात येताच तो इतरत्र पाहू लागला.
इतक्यात भावनाच्या समोर पाल पडल्याने तिने किंचाळून घाबरून सागरला घट्ट मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने सागर ने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण भावना अजून ही घाबरलेलीच होती, तिने अजुन ही सागरला घट्टच पकडून ठेवले होते. सागरला तिच्या ह्रदयाची स्पंदने स्पष्ट जाणवत होती, सागर ने आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात घेवुन मी आहे ना....आणि ☺️हसून साधी पाल तर होती, तिला इतकी घाबरलीस... वेडी असे म्हणून पुन्हा हसला. आता जरा तिची भीती कमी झाली आणि जराशी तिने मिठी सैल केली. दोघे ही एकमेकांच्या नजरेत हरवले होते,
सागरला आता राहवले नाही त्याने तिच्या डोळ्यांच्या पापन्यांना आपल्या ओठांनी स्पर्श केला, तशी भावना अंगअंग रोमांचित झाली होती, दोघांच्या ही आयुष्यातील हा रोमांचित करणारा अन पहिलेच चुंबन (किस) असा सुखद प्रसंग अनुभवत होते. आता मात्र भावनाने डोळे बंद करून त्याने पुन्हा किस करावे यासाठी आतुर झाली होती. सागरने ही आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवताच भावनाने ही त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत या पहिल्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेतली.
सागर आता डोक्याखाली हात घालून शांत विचार करू लागला, जे झाले ते योग्य की अयोग्य. इतक्यात त्याच्या कानांत वेड्या नको काळजी करुस तुझ्यामुळे आज या सुखाची अनुभूती मिळाली असे म्हणत त्याच्या छातीवर डोकं ठेवुन आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याच्या गालावर किस करून स्वतःला सावरत तयार झाली. सागर ने ही आवरले आणि दोघे ही पाऊस थांबन्याची वाट पाहू लागले.
यानंतर ची सलग कथा पुढील भागात आपण वाचू शकाल.☺️
सागर आणि भावना पाऊस थांबण्याची वाट पहात होते,
तसा बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी झाला होता पण पूर्णतः त्याने उघडीप घेतली न्हवती. भावना सागरच्या खांद्यावर डोक ठेऊन त्याचा हात हाती घेऊन त्या पावसाकडे, ज्या पावसाने तिला खुप काही दिल होतं तो ती कायमस्वरूपी डोळ्यात साठवण्या करिता पाहत होती. सागर मात्र... वेगळ्याच विचारात होता, घरी काय झाले असेल?, काय म्हणत असतील?.
ही कथा वाचण्या पूर्वी आधीच्या कथे संदर्भात खाली
दिलेल्या लिंक वर जाऊन वाचू शकता म्हणजे या कथेचा संदर्भ लागेल.
पावसाने कृपा केली आणि आता तो पूर्णतः थांबला होता, दोघांनी पटकन बाईक कडे धाव घेतली आणि घरी निघण्यास मार्गस्थ झाले. अचानक पडलेल्या पावसाने बऱ्यापैकी अंधारून आले होते आणि हवेत गारवा ही होता, त्यामुळे गाडी वर दोघेही गारठले होते. इकडे घरी प्रचंड तणावपूर्ण वातावरण झाले होते, दोघांना काही झाले तर नाही ना? आणि त्यात भावना असल्याने अधिकच तणावात होते. दीड दोन तासात दोघेही घरी पोहचले होते. गाडीच्या आवाजाने तडक घरातील सर्व जण बाहेर धावतच आले, दोघांना ही सुखरूप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.
सागर आणि भावना दोघे ही गाडी वरून उतरून सर्वांच्या समोर दबकतच आले, तसा दोघांवर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला होता, भावनाला काय बोलावे काहीच सुचत न्हवते. शुभदा धावतच भावना कडे आली आणि तिने काही न बोलता मिठीच मारली. सागर ने धीर धरून सांगण्यास सुरुवात केली, तसे भावनाने त्याच्या कडे पाहिले आणि काय सांगतो ते ऐकू लागली. सागर ने ही दोघां मधला प्रणय प्रसंग वगळता सारकाही जस घडलं तस सांगितले. हेे सर्व ऐकूूून घरचे शांत आणि तनाव रहित झाले होतेे.
या गडबडीत मात्र त्यांंना आत घ्यायचेच राहिले होते. अंघोळीचे पाणी तापेपर्यंत पटकन त्यांना शेकोटी पेटवून दिली, शेकोटी मुळे जरा त्यांची अंगातील हुडहुडी कमी झाली होती. पाणी तापता पटापट दोघांनी ही अंघोळी करून घेतल्या. हे सर्व होईपर्यन्त नऊ वाजुन गेले होते, जेवनासाठी सर्वजण बसले जेवता जेवता गप्पांची मैफिल कधी रंगली आणि कसा वेळ गेला हे कळलेच नाही.
शुभदा आणि भावना दोघी त्यांच्या रूम मध्ये जाऊन बेड वर आडव्या झाल्या होत्या. भावना आपल्याच विश्वात होती, मधेच लाजत होती, हसत😊😊 काय होती, शुभदा सर्व काही पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज तिला दिसत होते शुभदाला, न राहवून तिने चिमटा काढत विचारलेच, काय ग तुमच्या दोघांमध्ये काय भलत सलत तर नाही ना घडले? तशी भावना आपल्या विश्वातून बाहेर आली. आणि ए काही पण काय बोलतेस? चिमटा काढत विषय टाळण्याचा प्रयन्त केला. इकडे सागर आपल्या रूम मध्ये आला होता, प्रेमात भावनाच्या जसे अलगद पडला तसेच तो अलगद बेडवर आपले हात पसरून पडला. आणि त्या पहिल्या सुखद रम्य आठवणीनं मध्ये रमला होता. त्यात त्याला कधी झोप लागली कळलेच नाही.
शुभदा आणि तिच्या घरचे दरवर्षी कुलदैवत दर्शन घेण्यास जात असे, यावर्षी ही त्यांनी नियोजन करून सकाळीच तयारी करून निघू लागले, यांच्या सोबत भावनाची मात्र जायची अजिबात इच्छा न्हवती. याचे कारण म्हणजे सागर घरीच थांबणार होता, काही करून भावनाला सागर सोबत वेळ घालवायचा होता. शेवटच्या क्षणाला भावनाने गाडी थांबवा थांबवा असे सांगितले, आणि काही तरी राहिले आहे याचे निमित्त करून आणावयास निघताच अतिशय सफायदारपणे पडल्याचे नाटक करून जोरात किंचाळून पाय चमकल्याने चालता येत नाही असे सांगून रडू लागताच शुभदा आणि सागर तिच्या जवळ पळत आले आणि तिला आधार देऊन घरी सोफ्यावर बसविले, शुभदा ने तिला विचारता मी नाही जात थांबते तुझ्या सोबत असे म्हणताच, अग ठीक आहे मी नको काळजी करुस, आणि सागर आहे ना असे म्हणत सागरला हळूच डोळा मारला. सागरला कळून चुकले की नाटक करतेय. मग सागर ने ही मी आहे घरीच नाही जाणार कुठे, नको टेन्शन घेऊस असे तिच्या बहिणीला सांगून जायला सांगितले. शुभदा ने सागरला लक्ष ठेवायला सांगून ती निघाली.
त्यांची गाडी दूर जाताच भावना... मी ड्रेस बदलून आले असे सांगुन रूम मध्ये निघून गेली, बराच वेळ झाला अजून कशी नाही आली? म्हणून सागर तिच्या रूम जवळ जाऊन तिला आवाज देत होता पण काहीच प्रतिक्रिया येत नाही असे कळताच तो रूम मध्ये आला, बघतो तर काय...... भावना ने अतिशय सिल्की गाऊन घालून त्याची वाट पाहत उभी होती, यात भावनाचे सौंदर्य एखाद्या अप्सरा समान दिसत होते, जणू एखादी मदनिकाच त्याच्या समोर असल्याचे त्याला भासत होते, एक एक पाऊल टाकत भावना त्याच्या समोर येताच तिने त्याचे हात धरून आपल्या हृदयावर ठेऊन त्याला म्हणाली बघ.... माझ्या हृदयाची धडधड तुला जाणवते का? असे म्हणताच सागर ने तिला आपल्या मिठीत घेऊन अग वेडे☺️ ते तर.... सागर सागर असे म्हणत आहे असे म्हणत तिच्या खांद्या वरून तिचा गाऊन अलगद खाली घेत तिच्या हृदया च्या जागी किस करुन तिला विचारू लागला की काय ग?.... आता तर जास्तच धड धड करत आहे ☺️☺️ असे म्हणत तिच्या त्या गुलाबा समान कोमल ओठांचा आस्वाद घेऊ लागता भावना ने स्वतःला कामतृप्ती करिता त्याच्या स्वाधीन केले आणि अलौकिक अशा स्वर्ग सुखाचा आनंद दोघे ही उपभोगू लागले.
कथा :- नकळत सारे घडले -2
त्या स्वर्ग सुखाचा परमोच्च क्षण गाठून दोघे ही शांत निपचिप काही वेळ पडले होते. सागर ने भावनाला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या गालावर आपला हात अलगद फिरवत... भावना.. खूप प्रेम करतो ग.. तुझ्यावर☺️ असे म्हणताचं भावनाने लाडाने त्याचे नाक आपल्या चिमटीत पकडून ☺️ हो रे वेड्या माहितेय मला, माझ ही आहे, मी ही तुझ्या कधी प्रेमात पडले मलाच कळले नाही.
ही कथा वाचण्या पूर्वी आधीच्या कथे संदर्भात खाली
दिलेल्या लिंक वर जाऊन वाचू शकता म्हणजे या कथेचा संदर्भ लागेल.
काय रे... सागर मी.. इथून गेल्या वर मला विसरणार तर नाही ना? असे म्हणताच, नाही ग वेडे☺️... ते आता शक्य नाही, आणि तूझ्या शिवाय माझ्या जीवनात आता दुसरी कोणीही नसणार असे सागर म्हणाला. तुझंच सांग लग्न करशील ना?☺️ माझ्याशी, की आई वडिलांच्या पसंतीने करशील दुसऱ्या शीच लग्न. असे सागर म्हणताच भावना ने तुझ्या शिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करु शकत, आणि दुसऱ्या कोणाशी लग्न ही नाही करणार असे म्हणून त्याला विश्वथ केले. खरचं.. असे म्हणत सागर ने तिला आपल्या कवेत घेऊन तिच्या नाकावर लाडाने नाक घासून हसला, असे हसताच...होय..असे म्हणत तिने सागर च्या ओठांना किस करत त्याच्या केसांमधून हात फिरवत आवरण्या साठी उठू लागली,
पण सागर ने पुन्हा तिला आपल्या जवळ घेऊन थांब ना... जरा अजून असे म्हणाला, वेड्या बस झालं ☺️ आता येईल कोणीतरी म्हणत त्याला पण आवरायला सांगितले. ती आवरत असताना सागर तिच्याकडे पाहत होता... इतक्यात काय रे ह....☺️☺️ काय बघतोस? असा.. असे म्हणताच सागरने ही लगेच तुझं मनमोहक अप्रतिम सौंदर्य असे उत्तर दिले, खरंच का रे... मी इतकी सुंदर आहे असे तिने त्याला विचारले असता, हो ग... तू खूपच सुंदर आहेस असे सागर म्हणताच ती मनोमन लाजली.
भावना कपडे घालत असतानाच सागर ने तिला मागून आपल्या कवेत घेत का ग... तू इतकी गोड आणि मधाळ आहेस असं वाटतं कि.... असच तूला बघत रहावं, बस बस किती गोडवे गाशील माझे आता बस कर. असे म्हणत तिने सागर ला रूम मधून आता जा कोणीतरी यायच्या आत मी येते☺️ बाहेर असे म्हणत जायला सांगितले. सागर ला ही पटले आणि इच्छा नसताना ही तो बाहेर हॉल मध्ये येऊन बसला.
इतक्यात डोर ची बेल वाजली, शेजारच्या काकूंनी त्यांचे जेवण बनवले होते, ते द्यायला आल्या होत्या. सागर ने जेवण घेतले आणि ठीक आहे काकू जेऊन घेतो आम्ही आता असे म्हणत किचन मध्ये गेला, कानोसा घेऊन काकु ही निघून गेल्या. सागर ने तिला आवाज दिला जेवायला ये काकुनी जेवण दिले आहे जेऊन घेऊ आपण. भावना ही हो आलेच म्हणत आली खाली. भावना ने ताट धुवून आणि पुसून घेऊन दोघांचे ही ताट तयार करून जेवायला बसले, सागर ने ही मस्करीत अग बायको जरा पाणी दे असे म्हटले असता भावनाने ही हो देते ह... नवरोबा असे म्हणत हसली.
जेवण झाल्या वर भावनाने भांडी घासून पुसून पुन्हा जागच्या जागी ठेवले. सागर ने ही तिला आवरायला मदत केली. सर्व आवरून झाल्या वर दोघे ही टेरिस वर गप्पा मारत बसले होते. बराच वेळ त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. बोलता बोलता भावना भावुक होऊन सागरला म्हणाली, आता मला निघावे लागणार रे😞, सागर.. कस होणार आपले.. आपल्या प्रेमाचे? कसे आणि कधी भेटणार आपण?... मला नाही रे जमणार?... तुझ्या शिवाय. तू माझ्या आयुष्याचा भाग झाला आहेस रे. सागर ही स्तब्ध झाला होता, हो ग... भावना माझं पण असच काहीस झालं आहे, दोघे ही एकमेकांकडे पाहत होते, दोघांच्या ही डोळ्यात पाणी तरळले होते. .....
होणाऱ्या दुराव्याने दोघांच्या ही डोळ्यात तरळलेले पाणी दोघांच्याही गालावरून ओघळू लागले होते, आता मात्र हळवा स्वभाव असलेल्या सागरला आपल्या भावनांना आवरणे कठीण होत होते, त्याने भावनाच्या मांडीवर आपले डोक ठेऊन त्याच्या भावनांना वाट मोकळी केली होती, हे पाहून भावना त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. भावनाने त्याचा चेहरा आपल्या हाती घेऊन त्याचे डोळे पुसून 😢 तिचा ही ऊर भरून आला होता, तिने ही रडतच अरे वेडा आहेस का?....किती रे....हळव्या मनाचा आहेस तू, ....नको असं रडूस. तुला माहितेय का?...
तुझ्या या हळव्या आणि स्वछ मनामुळेच मी तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे रे☺️असे भावना म्हणताच, सागरने आपल्या डोळ्यातील पाणी पुसत हो... का?☺️असे म्हणत काही क्षण तिच्या कडे पाहत त्याच्या चेहऱ्यावरील तिचे दोन्ही हात आपल्या हाती घेऊन हाताच्या तळव्यांवर आपले ओठ टेकवुन.... आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ आणि प्रेम काय असत ते कळलं मला. असे म्हणताच भावनाने त्याच्या कपाळावर आपले नाजुक कोमल ओठ टेकवुन.... हो रे.... सागर आज मला ही प्रेमाची किमया, ती ओढ काय असते ते कळले.☺️ आय लव्ह यू...💓 सागर, तुझ्या या प्रेमापासून मला कधीच दूर नको ठेऊस, असे म्हणताच सागर ने ही तिला विश्वस्थ केले की, तू तर माझा श्वास आहेस ग... त्याला कधी दूर करता येईल का?... वेडे☺️आय लव यू टू 💓.
असे म्हणून दोघे ही हातात हात घेऊन टेरिस वरून खाली उतरू लागले. भावना मधेच थांबली आणि तिने त्याला मला उचलून घे असा प्रेमळ हट्ट केला, सागर ने हसतच😊 अरे हो..... मी तर विसरलोच की, तुझा पाय चमकला आहे, तुला चालता ही येत नाही, असे म्हणून तिला अलगद उचलले, भावना सागरच्या डोळ्यांमध्ये त्या दोघांचे बहरत असलेले सुंदर असे नाते पाहत होती, यामुळे ती मनोमन सुखावली होती. त्याने तिला सोफ्यावर बसवून तो ही सोफ्यावर वर विराजमान झाला होता.
संध्याकाळ होऊन गेली होती, शुभदा आणि इतर सर्वजण
यायची वेळ झाली होती. भावना ने सागर ला सहजच विचारले अरे मी जर स्वयंपाक केला तर चालेल का?.... कारण सर्वजण प्रवासाने थकलेले असतील काकूंना आणि शुभदा ला आल्यावर स्वयंपाक करावा लागेल, काकूंना राग तर नाही ना येणार? सागर☺️ तुला स्वयंपाक येतो? असे तिला विचारता त्याला हलकेच मारत... हो... मग तूला काय वाटले?... मला काही येत नाही का?☺️ सर्व स्वयंपाक येतो ह.... असे म्हणत तिने किचन गाठले आणि स्वयंपाकाला लागली. सागर ने ही त्याच्या परीने तिला मदत केली, तासा दिड तासात सर्वांचा स्वयंपाक तयार करून झाला होता. किचन नीटनेटके करून ती शुभदा च्या रूम मध्ये जाऊन आराम करत होती. सागर हॉल मध्ये टीव्ही बघत बसला होता.
काही वेळातच सर्वजण आले आणि फ़्रेश होऊन सारे हॉल मध्ये बसले होते, वाट बघत जेवणासाठी. शुभदाची आई किचन मध्ये जाऊ लागल्या इतक्यात स्वयंपाक भावनाने तयार केला आहे ग... आई... असे शुभदा ने सांगितले. तिच्या आईला भावनाचे मनोमन कौतुकच वाटले. शुभदा आणि भावना खाली आल्या आणि तिघीनी मिळून सर्वांना जेवण वाढले.जेवताना सर्वांनी तिच्या स्वयंपाकाचे मनोमन कौतुक केले. प्रवासाने सर्वजण कंटाळले होते. सर्व आपआपल्या रूम मध्ये जाऊन झोपी गेले होते. सागर ही त्याच्या रूम मध्ये जाउन झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याला झोप येत न्हवती.
इकडे शुभदा गप्पा मारता मारता तिची कधी झोप लागली तिचे तिलाच कळले नाही. भावना मात्र जागीच होती, दोन तीन दिवसात तीही निघणार होती, परत सागर ला भेटता येणार नाही म्हणून शुभदा गाढ झोपली की सकाळीच उठते हे तिला माहीत असल्याने ती सागरच्या रूम कडे निघाली. अनायसे सागर ला रूम चा दरवाजा उघडाच ठेऊन झोपायची सवय असल्याने ती कानोसा घेऊन तडक सागरच्या रूम मध्ये आली आणि हळूच दरवाजा आतून बंद करून सागर जवळ आली. हळूच बेड वर त्याच्या बाजूला येऊन त्याच्या चेहऱ्यावर हळुवार फुंकर घालुन त्याला उठवायचा प्रयत्न करत असता सागरला जाग येताच तिला आपल्या बेडवर पाहता खडबडून जागा झाला होता. हे स्वप्न आहे की सत्य हाच तो विचार करत असता भावनाने त्याला शांत होण्यास सांगितले आणि सर्व गाढ झोपेत आहेत काळजी नको करुस असे सांगून त्याला झोपावयास सांगितले. ती त्याच्या चेहऱ्यावरून हळुवार तिच्या केसांच्या बटा फिरवू लागली. ......
भावना जे काही करत होती त्याने सागर सुखावत होता. भावनाने सागरच्या कानाजवळ येऊन, आता... आपण कधी भेटणार माहीत नाही, माझी आठवण म्हणून आज माझ्या कडून तुला ही अनोखी भेट समज, असे म्हणत भावनाने त्याच्या कानांचा हळुवार चावा घेतला, आणि स्वतः पुढाकार घेत त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागली. सागर ला हे तिचे नवे रूप आणि सारकाही सुखावह होते. सागरवर स्वार होऊन आपल्या कोमल ओठांनी त्याच्या ओठांचा प्रदीर्घ आस्वाद घेत मदन क्रीडेतील त्या परमसुखाच्या अत्युच्य बिंदू पर्यंत पोहचे पर्यंत परम स्वर्ग सुखाचा दोघे ही आनंद उपभोगत होते, परमसुखाच्या अत्युच्य बिंदू पर्यंत पोहचल्यावर तिने सागर कडे बघत तिच्या डोळ्यांच्या भुवया उंचावून काय☺️? असे इशारा करत त्याच्या केसां मधून लडिवाळ पणे हात फिरवून त्याच्या कुशीत जाऊन काही वेळ त्याच्या शी गप्पा माऱल्या.
त्याच्या गालावर किस करून बेडवरील तिची वस्त्र घेऊन स्वतःला सावरून निघू लागली, निघताना भावनाचे डोळे पाणावले होते, सागर उभा राहून ती निघताना तिच्या कडे पाहत होता. दरवाज्या पर्यंत जाऊन मागे वळून पाहता पुन्हा पळत येऊन सागरला तिने घट्ट मिठी मारली. सागर ने ही तिला आपल्या कवेत घेवून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवुन सागरने तिला अलगद उचलुन दरवाज्या पर्यँत आणले, दरवाजा उघडून त्याने आधी अंदाज घेतला आणि तिला जाण्यास खुणावले. भावना ने ही पटकन कानोसा घेत शुभदा च्या रूम मध्ये येऊन बेडवर शांत निपचिप पडली. इकडे सागर ही बेडवर निपचिप पडून होता. तिच्या पहिल्या भेटीपासून ते या क्षणा पर्यंत सार काही त्याच्या डोळ्या समोर एखाद्या चित्रफिती समान तरळून गेले होते. सकाळ होत आली तरी तो जागाच होता.
तसे ही आज सगळेच उशिरा उठले होते. इकडे भावना आणि शुभदा ही उशिराच उठल्या होत्या. दोघी ही त्यांच्या हॉस्टेल च्या सवयी नुसार एकत्रच अंघोळीला गेल्या होत्या. सारकाही आटपून दोघी ही खाली आल्या होत्या. शुभदा ने आईला आवाज देऊन नाष्टा तयार आहे का? ग... विचारता, आईने.... हो तयार आहे घेऊन जा असे सांगितले. शुभदा ने किचन मध्ये जाऊन दोघीं करीता नाष्टा आणून भावना हे घे ग... असे म्हणाली पण तिचे लक्षच न्हवते, तिची नजर सागर ला शोधत होती. शुभदा ने शेवटी वैतागून तिच्या मांडी वरच प्लेट ठेवली, प्लेट गरम असल्याने भावना भानावर आली होती. तिने सागर कुठे आहे असं शुभदा ला विचारता माहीत नाही ग... कदाचित उठलाच नाहीये तो, असे म्हणून गरमा गरम नाष्ट्यावर ताव मारू लागली. भावना ने त्याला सांग ना रिझर्वेशन करायला ट्रेन चे, ... उद्या मी निघायचे म्हणते ग... असे म्हणता शुभदा ने तिला ए... का ग? असे विचारले. अग... आता महिना होत आला आहे, जाऊ देत मला. असे भावना शुभदा ला म्हणाली.
शुभदा ने सागर ला खालूनच जोरात आवाज दिले, तसे सागर ला जाग आली आणि काय ग दीदी? असे खाली येत विचारले असता भावना साठी ट्रेन चे उद्याचे दादर पर्यंतचे रिझर्वेशन कर न चुकता,... असे शुभदा ने त्यास सांगितले. हो... करतो असे म्हणून सागर अंघोळीला गेला. सागर नाष्टा करून रिझर्वेशन साठी निघाला. त्याने भावनाची खिडकी जवळील सीट बुक करून स्वतःसाठी पण वेगळे रिझर्वेशन करत तिच्याच बाजुची सीट बुक करून बाकीची ही कामे उरकून घरी परतला होता. घरी येताच भावनाला त्याने उद्याच्या ट्रेन चे तिकीट हाती दिले आणि काही न बोलता तिच्या कडे बघून निघून गेला. भावना ला एक सुखद धक्का द्यायचे नियोजन करुन त्याने दोन दिवस लागतील एवढे कपडे घेऊन घरी मित्रांसोबत पिकनिक ला जात आहे... दोन तीन दिवस असे... सांगून मित्रा कडे निघून गेला. त्याच्या या वागण्याने भावना जरा नाराज झाली होती रात्री झोपे पर्यंत ती तुपाची वाट पाहत होती, पण त्याच्या न येण्याने भावना वाट पाहून झोपी गेली .
इतक्यात तिथे बसलेल्या मुला (सागर) ने तिला विचारले, काय झाले मिस?.... पण भावनाने त्याच्या कडे रागाने पाहिले. सागर ने पूर्ण चेहरा झाकल्याने तिला कळलेही न्हवते, आणि पुन्हा खिडकी तुन बाहेर पहात राहिली. पुन्हा हसतच सागर ने भावना मॅडम आपण का रडत आहात? असे विचारता या मुलाला आपले नाव कसे माहीत? या विचाराने तिने पुन्हा त्या कडे पाहिले असता, सागर ने आपला झाकलेला चेहरा ओपन केला. सागर ला पाहताच भावनाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता, सागर... असे म्हणून आनंदाने मिठी मारली. आणि का रे? शहाण्या एवढे रडवलेस मला, असे म्हणून त्याला लडिवाळ पणे मारू लागली, अग हो.. हो.. बस की आता☺️ असे हसतच सागर म्हणाला........
कथा :- नकळत सारे घडले भाग-3
अग तू मला काल इतके सुंदर आणि कायम स्मरणात राहील अशी भेट दिलीस, मग मला नको द्यायला, म्हणून हे नियोजन केले. मग... कस वाटलं तुला हे सरप्राईझ☺️ सागर ने असे तिला विचारले. भावनाने ही... मस्करीतच हो.... आवडलं असतं, जर थोडीशी तरी कल्पना दिली असतीस तर. तसा सागर चा चेहरा पडल्या सारखा झाला होता, पण लगेचच भावना ने सांगितले, अरे... मी मस्करी केली रे... मग किती रडवलेस.... कालपासून मला. पण खरचं.. खूप छान गिफ्ट आहे माझ्यासाठी, असा.. तू माझ्या सोबत☺️. असाच कायम रहा माझ्या सोबत असे म्हणून त्याच्या कडे बघत मनापासून हसली.
भावना खुप खुश होती, सांगली स्टेशन आले होते, सागर च्या हातात हात घालून भावना त्याच्या शी गप्पा मारत होती. काय? आणि किती?... बोलू असे तिला झाले होते. तिची अखंड बडबड सुरू होती, आणि सागर ही सारकाही ऐकत होता. भावना ने त्याला विचारले... काय रे सागर ? तू याआधी मुंबईला आला होतास का? सागर ने☺️ हसूनच नाही ग .. पहिल्यांदाच येत आहे असे सांगितले. म्हणजे तू मुंबई पण पहिली नाहीस, अरे वाह... किती मस्त ना.... खूप मजा करूयात आपण... मी दाखवते तुला असे सागरला म्हणाली. अग भावना मी तुला सोडून लगेच निघणार आहे, मी नाही थांबणार... आणि जरी थांबायचे म्हटले तरी माझे कोणी मित्र परिवार नाही, नातेवाईक आहेत पण कसे जाऊ? घरी कळले तर गडबड होईल असे म्हणता भावना नाराज झाली होती.
थोड्या वेळेसाठी ती काहीच बोलली नाही. सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होता, अग.. आपल्या दोघां बद्दल घरी कळले तर?... म्हणून मी नाही म्हणत आहे. पण काही केल्या भावना चा रुसवा जात न्हवता. शेवटी एक मोठा दिर्घ श्वास सोडून... सागर ने ठीक आहे... बाबा तुझ्याच मनाप्रमाणे करूयात आपण☺️. तशी भावनाच्या गालावर कळीच☺️☺️ खुलली होती. त्यातच तिचे ते मधाळ हास्य, चेहऱ्यावर पडलेल्या उन्हामुळे आणि हवेने उडणाऱ्या बटांमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती.
ट्रेन ने पुणे स्टेशन गाठले होते. दोघांना ही भूक लागलेली होती. सागर ने.. तू काय खाणार?... असे विचारता तिने इथे भेळ खुप छान मिळते आणि त्या सोबत पेरू आणावयास सांगितले. सागर ने पटकन ट्रेन मधून उतरून तिने सांगितल्या नुसार ओली भेळ आणि चांगले निवडक पेरू घेऊन आला. दोघे ही फ्रेश होऊन, ओल्या भेळ चा आस्वाद घेतला, भावनाने सांगितल्या नुसार भेळ खरच चविष्ट होती. सागरला ला ही भेळ आवडली होती, पुन्हा जाऊन दोघां करिता त्याने ओली भेळ आणून ती त्यांनी संपवली देखील. दहा ते पंधरा मिनिटां नंतर ट्रेन पुणे स्टेशन वरून मार्गस्थ झाली होती.
मुबईत कोण कोणती ठिकाणे चांगली आहेत त्यांच्या बद्दल त्याला माहिती देत होती. मधेच सागर ने तिला मला लोकल ट्रेन मधून प्रवास करायचा आहे, खुप काही ऐकून आहे, म्हणे खूप गर्दी असते, मला ती गर्दी बघायची आहे आणि त्यातून प्रवास ही करायचा आहे. तशी भावना म्हणाली, लोकल ट्रेन?... अरे ती तर मुंबईची लाईफ लाईन आहे... शान आहे... ती नाही तर मुबई नाही. पुढच्या काही वेळातच ते दादर ला पोहचणार होते, सागर ही पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने तो ही उत्सुक होता. .....
काही क्षणातच ट्रेन दादर स्टेशनला पोहचली, भावना आणि सागर लगेज घेऊन उतरण्याच्या तयारीत होते. जस जसे पुढचे पॅसेंजर उतरता दोघे ही पुढे सरकत दादर स्टेशन ला उतरले. उतरताच सागरचे मुंबईतल्या धक्यांनी जंगी स्वागत झाले होते, काय होतय हे त्याला कळलेच न्हवते. भावनाने त्याला हाताला धरून त्या गर्दीतून ओढून घेतले. आणि सांगितले, असे उभे नको रहात जाऊस, पटकन बाजूला व्हायचे☺️ कळले ना?.... मुंबई कशी आहे ती, इथे ऑफिस सुटल्यावर प्रत्येकजण घरी जाण्याच्या तयारीत असतो, त्याला ट्रेन आणि ट्रेनचा डोर शिवाय काही दिसत नसते☺️☺️... चल आता असे म्हणत ते ब्रिजवर जाण्यास निघाले.
दादर ब्रिजवर चढताच हा एवढा जनसागर बघून सागर अचंबित झाला होता. कोल्हापूरला मोर्चा अन जत्रेतच इतकी किंव्हा कमीच लोकं पाहिली असतील. या गडबडीत मात्र भावना पुढे निघून गेली होती. तिला तो आपल्या पाठोपाठ च आहे असे समजुन ती चालत राहिली होती. सागर ला भावना कुठेही दिसत नसल्याने कावरा बावरा झाला होता, त्याची नजर तिथेच उभे राहून तिलाच शोधत होती त्या गर्दीत. इकडे सागर आपल्या सोबत नाही हे कळताच भावना खूपच घाबरली होती, काय करावे तिला सुचत नव्हते, ती पुन्हा माघारी फिरून त्याला शोधू लागली. त्या गर्दीत इतरां पेक्षा वेगळा आणि नवखी व्यक्ती म्हणून सागरला तिने पटकन ओळखले आणि धावत जाऊन त्याला बिलगली, आय एम सॉरी सागर.....😢 सगळी माझीच चुक आहे, मला कळायला हवे होते असे म्हणत त्याच्या सोबत गर्दीतून वाट काढत चालू लागली होती.
दादर इस्ट मधून बाहेर निघाल्या वर तिने सागर करिता चांगल्या हॉटेल ची चौकशी करून त्याच्या करिता योग्य रूम बुक केली आणि रूममध्ये जाऊन सारकाही व्यवस्थित आहे का? हे पाहून आणि या इंटरकॉम वरून काय हवे ते मागव. असे म्हणत त्याच्या गालावर किस करून घरी जाण्या करिता निघाली. तिला घरी पोहचायला जरा उशीरचं झाला होता, घरातले सर्वजण तिच्या साठी जेवायचे थांबले होते. पटकन फ्रेश होऊन साऱ्यांसोबत तीही जेवायला बसली, जेवता जेवता तिने कोल्हापूरला केलेली धमाल, मजा मस्तीचे किस्से आणि विशेष म्हणजे तिला ते गाव खूपच आवडले असे सांगितले. जेवण झाल्यावर मी उद्या मैत्रिणीकडे जाणार आहे आणि यायला उशीर होईल, असे सांगून झोपावयास निघून गेली. उद्या सागरला भेटायचे या विचारातच ती कधी झोपी गेली तिलाच कळले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आईने बनवलेला नाष्टा खाऊन सागरच्या रूम कडे रवाना झाली. तस तिच्या घरापासून जास्त लांब नसल्याने लगेच ती सागर ज्या हॉटेल वर थांबला होता तिथे पोहचली होती. रिसेप्शन वर नोंद करून तिने सागरच्या रूम ची डोर बेल वाजवली. बराच वेळ बेल वाजवल्या नंतर सागर ला जाग आली आणि त्याने डोर उघडला. अरे सागर तू अजून तयार नाहीस असे म्हणत त्याला अंघोळीला पाठवले, त्याचे बाकीचे आवरेपर्यंत कॉल करून नाष्टा मागवून ठेवला होता.
भावनाने त्याला मस्करीतच... ए काय रे सागर... ☺️नक्की काय बघतोयस? इमारती की मुली😊 विचारले असता सागर ने पण ☺️ हसतच सुंदर मुली पाहत आहे, असे म्हणत तो ही मस्करीत हसला. गेट वे ऑफ इंडिया येता दोघे ही उतरले. जगातील एक भव्य दिव्य वास्तु आणि ताज हॉटेल हे याची देही याची डोळा पाहत होता. पाहण्या सारखेच होते. भावना त्याच्या हातात हात घालून त्याला गेट वे ऑफ इंडिया चारी ही बाजुने दाखवत होती. त्याच जोडीला खट्याळ पणे प्रेमात अखंड बुडालेले प्रेमीयुगल ही दाखवत होती. ते पाहून सागर जरा लाजतच होता. त्या उधानलेल्या अथांग समुद्राकडे सागर एकटक पाहत होता, त्याला त्यातून जागे करून भावनाने सागर बरोबर तिथे फिरणाऱ्या फोटोग्राफर कडून विविध पोझ मध्ये त्याच्या सोबत फोटो त्याची आठवण म्हणून काढून घेतले. फोटॊ काढताना सागर मात्र लाजत होता. फोटो काढून झाल्यावर लॉंच मधून दोघांनीही त्या अथांग समुद्र सफारी चा आनंद अनुभवला.
सागर ने भावना.. आता कुठे जायचे? असे विचारता तिने क्षणाचा ही विचार न करता मारिन ड्राईव्ह आणि बीच वर जाऊयात असे म्हणत त्याचा हात हाती घेऊन टॅक्सी करिता उभे होते, टॅक्सी मिळताच तिथून मारिन ड्राईव्ह करिता रवाना झाले. मारिन ड्राईव्ह ला पोहचताच त्या मारिन ड्राईव्ह च्या दगडी तटबंदी (दगडी बांधकाम असलेल्या भिंती) वर ऊभे राहून वाऱ्याच्या सोबत उसळणाऱ्या त्या बेभान लाटांचा आणि धुंद करणारा त्या लाटांचा आवाज असे मनमोहक नजारा दोघे ही शांतपणे पाहत होते. भावनाने त्याला विचारले.. सागर कसा आहे?... हा नजारा. सागर च्या ओठावर अप्रतिम, शब्दात नाही ग... मी तुला सांगू शकत. थँक्स☺️ भावना तू मला थांबवून घेतलेस... त्या मुळेच मी हे दृष्य पाहु शकत आहे. पुन्हा एकदा थँक यू... सो मच. असे म्हणत ते त्या भिंतीवरून चालू लागले.
चालताना इथे ही बिनधास्त पणे प्रेमी युगल त्याच्या प्रेमात मश्गुल होते. भावना ने त्याला डोळ्यांनीच खुणावले बसायचे का रे असे☺️. तसे सागर ए काही ही काय☺️ असे म्हणत पुढे चालू लागला. छान पैकी योग्य जागा बघून दोघे ही बसले. सागरने तिचा हात आपल्या हाती घेउन त्या अथांग सागरला पाहत होता, आणि भावना तिचे डोकं त्याच्या खांद्यावर ठेवुन प्रेमावरील गाणं गुणगुणत होती.
त्याने क्षणाचा ही विलंब न करता त्या लाटांच्या दिशेने धावून गेला त्या लाटां सोबत धुंद होण्या करिता. लहान मूल जशी बेभान होऊन खेळतात तसा सागर त्या लाटांसोबत खेळत होता, भावना ही त्याच्या सोबत त्याला बेधुंद होऊन साथ देत होती. भावना जरा वेळाने त्या लाटांमधून बाहेर येऊन वाळूवर बसली होती, आणि त्याला जास्त आत नको जाऊस... सागर... असे सारखे समजावत होती. मनसोक्त मजा करून झाल्या वर सागर तिच्या जवळ येऊन बसला. तिला मिठी मारत... भावना आजचा दिवस माझ्या साठी खूप स्पेशल आहे, मी कधीच विसरणार नाही. असे म्हणता भावनाने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेऊन त्याच्या केसांमधून हात फिरवत हो का....? असे म्हणत त्याच्या गालाला चिमटा काढत शहाण्या तू तर मला सोडून लगेच जाणार होतास ना☺️, बघ माझं ऐकलस म्हणून तु आज किती खुश आहेस असे म्हणाली. सागर ही शांत पणे स्माईल देत तिच्या कडे एकटक बघत तिचे ऐकत होता. भावनाने आजुबाजूचा अंदाज घेत त्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेतले. संध्याकाळ होण्यास सुरुवात झाली होती आणि दोघे मस्त रोमँटिक मूड मध्ये होते.
वेळेचे भान लक्षात येताच विलग झाले आणि निघण्या पूर्वी खूप भूक लागल्याने त्या नयनरम्य सांज सोबत दोघांनी ही मस्त ओली भेळ आणि पावभाजी वर ताव मारला. .....
एलिफंटाच्या पायथ्याशी पोहचल्यावर दोन्ही बाजूने मन मोहक वस्तू आणि कपड्याची स्टॉल स्वरूपात दुकाने होती. सागर ने भावना करिता ती नको म्हणत असताना ही तिला आवडेल अशी चांगली पर्स घेतली, आणि स्वतः साठी एक तिच्या नावाचे ब्रेसलेट घेऊन त्या एलिफंटाच्या पायऱ्या चढु लागले. त्या जागी पोहचल्यावर तिथल्या प्राचीन गुफा लेणी त्यांचे कोरीव काम पाहण्यात सागर तल्लीन झाला होता. आणि विशेष म्हणजे तिथे असलेल्या लोकल गाईड कडून त्या प्राचीन ऋषी मुनींची निवासस्थाने तसेच लेण्यांच्या बद्दल माहिती घेत होता. दोघे ही सारकाही पाहून झाल्यावर एका लेण्या जवळ असलेल्या दगडावर निवांत बसून त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल तसेच मनसोक्त गप्पा मारल्या. भावनाला सागर ने आपल्या कवेत घेऊन.... थँक्स फॉर एवरीथिंग☺️ भावना असे म्हणत तिचा हात धरून... चल निघुयात आता असे म्हणत तिथून दोघे ही निघाले. खाली उतरत असताना एका हॉटेल मध्ये जेवण करून त्या धक्यावरून हाती हात घेउन त्या लाटांचा मनमोहक नजारा बघत चालत लाँच जिथून निघतात तिथे येऊन लाँच ची वाट पाहात होते. लाँच येता त्यामधून पुन्हा गेट वे ऑफ इंडिया च्या दिशेने रवाना झाले होते. दोघे ही लाँच च्या किनाऱ्या जवळ उभे राहून उसळणाऱ्या त्या लाटा, त्यासोबत मासे पकडण्यासाठी आजूबाजूने उडणाऱ्या पक्षांचे थवे असे नयनरम्य नजारे बघत गेट ऑफ इंडिया ला पोहचले होते.
तिथून दादरला थांबलेल्या हॉटेल करिता रवाना झाले. हॉटेल वर पोहचताच सागर मस्त पैकी थंड पाण्याने अंघोळ करून बाहेर आला होता. त्याच्या पाठोपाठ भावना ही अंघोळीस गेली. तोपर्यंत सागर टीव्ही वर त्याचा आवडता पिच्चर क्रिमिनल बघत बसला होता. भावना चे अंघोळ करून बाहेर येणे आणि त्याच वेळी पिच्चर मधले "तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहीये" हे गाणं सुरू झाले होते. भावना बाहेर आली आहे याची सागरला कल्पना नव्हती. टॉवेल लपेटूनच ती सागर जवळ अलगद येऊन तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने वर करत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि मिश्किल पणे☺️ त्याच्या पासून जरा लांब जाऊन पाठमोरी उभी राहिली होती. सागर ला भावना चा इशारा कळताच तो तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या पाठीवरून अलगद केस बाजूला सारून तिच्या पाठीवरील ओघळणारे थेंब आपल्या ओठांनी टिपू लागला होता, आणि इकडे सुरु असलेले रोमँटिक गाणे.. तस तसे भावना बेधुंद होत होती. त्याचा ओठांचा प्रत्येक स्पर्श तिच्या नसा नसांतून रोमहर्षित होऊन तिला उत्तेजित करत होते. आता मात्र भावना ने आपल्या अंगावरील लपेटलेला टॉवेल स्वतःच्या हाताने काढून त्याला बिलगली होती. आणि आपल्या अधीर झालेल्या ओठांनी त्याच्या ओठांचे बेधुंद होऊन दीर्घ चुंबन घेत काम इच्छे च्या पुरती करिता पूर्णतः त्याच्या स्वाधीन झाली होती. सागर ने तिला अलगद उचलून बेड वर आणून दोघे ही त्या परमोच्च कामक्रीडे चा आनंद उपभोगू लागले होते. कामक्रीडेच्या त्या शेवटच्या क्षणांना तृप्त पणे उपभोगुन झाल्यावर दोघे ही एकमेकांकडे पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांना सागर.. आपल्या बोटांनी बाजुला करत... भावना.. 😢 आता मला निघावे लागणार असे तिला म्हणाला. असे म्हणताच भावना च्या डोळ्यांमध्ये पाणी तरळून आले होते.
कथा :- नकळत सारे घडले -4
भावनाच्या डोळ्यांमध्ये आलेले पाणी सागर ने अलगद पुसले. आणि तिला समजावले अग... आज ना उद्या मला जावेच लागणार ना.. नको रडूस ☺️ आजचा दिवस आपण खूप छान घालवला आहे. भावना त्याच्या समोर बसत ... मला तुला भेटता नाही येणार आता याच खूप.. वाईट वाटतंय रे.. माझ्या साठी हे खूपच त्रासदायक आहे रे... सागर तू उद्या जाणार आहेस तर हे हाल आहेत माझे, तू नसल्यावर तर कस होणार माझं काय माहीत?.. व्यक्त होत म्हणाली. अग भावना मला तरी कुठे हा दुरावा सहन होणार आहे का?, अग ते जाऊ देत, आपण एकमेकांशी कसे बोलणार?.. घरच्या फोन वर आपण बोलू नाही शकणार. मी एक करू शकतो, माझा मित्र आहे त्याचा फोन बूथ आहे, तिथून मी तुला फोन करत जाईन आणि नंतर मी पपांच्या मागे लागून फोन घेईन☺️.. मग काहीच अडचण नसेल. पण तू कसे करणार आहेस? आणि तुला मी कसे कॉन्टॅक्ट करू?.. अग तू गप्प का? आहेस बोल ना काहीतरी.
दोघांनी ही नाष्टा केला आणि रिझर्वेशन करिता बाहेर पडले. दादर हुन ट्रेन पकडून cst ला पोहचून सह्याद्री चे रिझर्वेशन करण्या करिता रांगेत उभे राहिले. त्यांच्या पुढे बरेचजण असल्याने बराच वेळ लागणार होता, तोपर्यन्त त्यांनी रिझर्वेशन फॉर्म भरून घेतला होता. नंबर येताच हव्या असलेल्या ट्रेन चे रिझर्वेशन मिळताच भावनाच्या चेहऱ्यावर समाधान होते. रिझर्वेशन झाल्या वर आता काय करायचे असा प्रश्न सागर ने भावनाला विचारला. भावना.. हो रे मी ही तोच विचार करतेय.. थांब जरा असे भावना म्हणाली. ती विचार करेपर्यंत सागर शांतपणे स्टेशन वरील वर्दळ न्याहाळत होता. तसेच होणाऱ्या ट्रेन च्या अनाऊन्समेन्ट नंतर ट्रेन करिता धावपळ करणाऱ्या लोकांकडे कुतूहलाने पाहत होता.
दोघे ही शांत होते, होणाऱ्या दुराव्यामुळे ही शांतता होती. शेवटी सागर ने तिला विचारलेच का ग ? तु का अशी गप्प आहेस?... बोल काहीतरी. भावना.. तू निघाला आहेस ना.. आता आपण भेटू नाही शकणार या विचारानेच जरा अस्वस्थ आहे रे, बाकी काही नाही असे म्हणाली. अग भावना.. माझी पण तीच अवस्था झाली आहे, तुझ्या असण्याची तुझ्या सहवासाची मला सवय झाली आहे ग.. आणि आता आपल्याला भेटता येणार नाही त्यामूळे मी ही बैचेन झालो आहे.दोघांच्या ही मनात भयाण अशी शांतता पसरली होती. एक्सप्रेस प्लॅटफॉर्म ला आली होती, दोघांनी ही एकमेकां कडे खिन्न मनाने पाहिले दोघांच्या ही डोळ्यांत अश्रू तरळून आले होते, निघावे तर लागणारच होते. सागर ने आपली बॅग घेत बोगी मध्ये चढला त्या पाठोपाठ भावना ही चढली होती. रिझर्वेशन नुसार सीट पाहून सागर आपल्या सीट वर बसला होता. बाजूची सीट रिकामीच असल्याने भावना काही क्षण त्याच्या जवळ बसली. काय बोलावे दोघांना ही सुचत नव्हते, पाणावलेल्या डोळ्यांनी दोघे ही एकमेकांकडे फक्त पाहत होते. त्या डोळ्यांमधील अश्रूच जणू एकमेकांशी बोलत होते असे वाटत होते. यातच अचानक अग भावना... तू मला सायलीच्या घरचा नंबर दिलाच नाही.. चल दे लवकर असे म्हणताच भावना ही आपले अश्रू पुसत अरे हो रे.. मी पूर्णपणे विसरलीच होते, थांब थांब देते तुला असे म्हणत डायरी मधून तो नंबर काढून तिने सागरला दिला आणि नीट ठेव जपून नाहीतर आपल्याला बोलता नाही यायचे, अजून कुठेतरी नोट करून ठेव असे भावना म्हणाली.बर झालं तू आठवण केलीस नाहीतर काही खर नव्हतं असे म्हणत भावना ☺️ हसली. एक्सप्रेस सुटण्याची वेळ झाली होती, भावनाने त्याला घट्ट मिठी मारली आणि महिन्यातून जमल्यास एखादी चक्कर मारत जा म्हणत तिने त्याच्या कडे पाहिले, सागर ने ही तिच्या गालावर हात ठेवून हो भावना.. नक्की प्रयत्न करेन आणि आपण फोन वर दर मंगळवारी दुपारी बोलूच, तू नीट रहा आणि आता तू उतर खाली ट्रेन सुरू होईल असे सांगितले. भावना ही हो म्हणत खाली उतरली. आणि ट्रेन च्या खिडकी जवळ येऊन खिडकीवर हात ठेवून उभी राहिली त्याच्या कडे पाहत. तिच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून सागर ने तिच्या हातावर आपला हात ठेवत अश्वस्थ केले. ट्रेन निघण्या पूर्वी हॉर्न वाजला होता, तसे भावना ने त्याचा हात घट्ट पकडून डोळ्यांनीच तू नको जाऊस असे सांगत होती. सागर ने तिचे डोळे पुसत त्याला ही भरून आले होते त्यामुळे काहीच बोलायला न येत असल्याने त्याने ही आपल्या डोळ्यांनीच सांगण्याचा प्रयत्न केला.
ट्रेन ने हळू हळू प्लॅटफॉर्म सोडायला सुरवात केली होती, तरीही भावनाने त्याचा हात सोडला नव्हता, तीही ट्रेन सोबत चालु लागली होती, मात्र ट्रेन चा वेग वाढताच तिला त्याचा हात सोडावा लागला होता. सागर ही पटकन जागा सोडून डोर ला आला होता, त्याने ही पाणावलेल्या डोळ्यांनी तिला तो दिसे पर्यंत हात केला. इकडे भावना आहे त्याच जागी उभी राहून स्तब्ध होऊन सागर कडे पाहत होती. तिच्या डोळ्यातील अश्रूंनी हळू हळू त्याचा चेहरा धूसर झाला होता. ट्रेन ने प्लॅटफॉर्म सोडला होता, तरीही भावना खिन्न मनाने तिथेच उभी होती. इतर जणांचे तिला धक्के लागत होते, तरीही ती स्तब्ध उभी होती बराच वेळ.
बऱ्याच वेळाने भानावर आल्यावर पाणावलेल्या डोळ्यांमुळे तिला सारकाही धूसर दिसत होते, डोळ्यांमधले पाणी पुसत ती काही वेळ बाकड्यावर बसून राहिली. सागर व्यतिरिक्त तिच्या डोक्यात दुसरा कोणताच विचार घोळत न्हवता. स्वतःला सावरून भावना घरी जाण्या करिता निघाली. ट्रेन पकडून भावना दादर स्टेशन ला उतरली होती, गेले दोन तीन दिवस सतत सागर तिच्या सोबत असल्याने या क्षणी तो तिच्या सोबत नाही हे तिला प्रकर्षाने जाणवत होते. इकडे सागर ला ही तिच्या सोबत भावना नसल्याने त्याच्या साठी भकास रटाळवाना असा प्रवास होता. त्याच्या डोळ्या समोर अति भावुक झालेल्या भावनाचाच चेहरा येत होता. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर अंधार असल्याने घरांमधले आणि खांबावरील लाईट व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. तो ही तसाच खिन्न मनाने एकटक त्या दिसणाऱ्या मिणमिणत्या लाईट कडे पाहत होता. सागरसाठी हा प्रवास म्हणजे वेळ जाता जात न्हवता.
इकडे भावना खिन्न मनाने स्टेशन च्या बाहेर पडून घरी जाण्या करिता टॅक्सी पकडून निघाली होती. तिने सांगितल्या नुसार टॅक्सीवाल्याने ती राहात असलेल्या सोसायटी समोर टॅक्सी थांबवली होती, पण भावनाचे लक्षच न्हवते. अरे मॅडम.. क्या आपको उतरना नही है क्या? असे टॅक्सीवाल्याने विचारता भावना भानावर आली होती. सॉरी भैया.. मेरा ध्यान नही था.. असे म्हणत पैसे देऊन टॅक्सी तुन उतरून घराकडे निघाली. डोरबेल वाजवता आईने दरवाजा उघडला होता, तिचा उदास झालेला चेहरा पाहता आईने काय ग... काय झाले आहे तुला? बरं नाही का वाटत? असे विचारले पण काही न बोलता भावना आपल्या रूम मध्ये गेली होती. आईने पण इतकं काही झालं नसेल कंटाळा आला असेल असे समजून ती पण आपल्या कामाला लागली होती. जेवण तयार झाले होते सगळे जेवायला आले होते, पण भावना आवाज देऊन ही तिच्या रूम मधून बाहेर आली न्हवती. तिला हा दुरावा सहन होत नसल्याने उशी (पिलो) मध्ये चेहरा घालून रडत होती. भावनाची आई तिच्या रूम मध्ये तिला उठवायला तिच्या जवळ आली असता भावना ने आई म्हणत तिच्या कुशीत जाऊन रडू लागता पुन्हा आई ने अग सांग तरी.. मघाशी पण काहीच बोलली नाहीस आता तरी सांग असे म्हणता, भावना रडतच काही नाही ग आई.. असे म्हणत उठली, आणि तिच्या आई सोबत जेवायला गेली. जेवण करताना काहीच न बोलता शांत, कोणत्या तरी विचारात मग्न आहे हे तिच्या आई वडिलांना दिसत होते, भावनाच्या वडिलांनी पण तिला विचारले असता भावना काहीच न बोलता शांत होती. जेवण होताच आई वडिलांना गुड नाईट म्हणत पुन्हा तिच्या रूम मध्ये निघून गेली होती. बेडवर स्वतःला तिने झोकून दिले होते. ती पूर्ण रात्र भावना जागी होती, सागर आणि तिने घालवलेल्या प्रत्येक क्षणांना भावना उशी आपल्या छातीला कवटाळून कुरवाळत होती.
इकडे सागर ला ही झोप काही येत न्हवती, ट्रेन मधले सारे जण झोपेत आणि हा मात्र तिच्या आठवणीत तळमळत होता. कधी एकदाचे कोल्हापूर येतंय असे त्याला झाले होते, सरता रात्र सरत नव्हती. इकडे भावनाने पूर्ण रात्र उशी छातीला कवटाळून सागरच्या आठवणीत अश्रूंशी जवळीक केली होती.पहाट होऊन दिवस उगवू लागला होता, तरीही दोघे ही जागेेच होते एकमेकांच्या आठवणीत. भावनाचे डोळे रात्रभर जागून आणि रडून सुजले होते. उठून चेहरा स्वछ धुऊन पुन्हा बेड वर येऊन टेबल वर असलेले पुस्तक चाळत होती. इकडे कोल्हापूर स्टेशन आले होते, सागर आपली बॅग घेऊन ट्रेन मधून उतरला होता. स्टेशन मास्टर ला विनंती करून मित्राच्या घरी फोन करून त्याला घ्यायला बोलावले होते. तोपर्यंत बाहेर मस्तपैकी चहाचा झुरका घेत त्याची वाट पाहत होता.
सागरचा मित्र वैभव बाईक घेऊन पोहचला होता, त्याला बघताच सागरने ए वैभ्या... म्हणत जोराची हाक मारली. वैभव ने पण त्याला पाहताच लगेच बाईक त्याच्या कडे वळवली. सागरने चहावाल्याला एक स्पेशल बनवायला सांगितले, तोपर्यंत वैभव ने सागरवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती. कारण ही तसेच होते, सागरने जाताना मित्रां सोबत पिकनिक ला निघालो आहे असे घरी सांगितले होते, त्यामुळे मित्रांना गावात फिरता देखील आले नव्हते. तसे सागर स्वतः आणि सागरचे मित्र हे जीवाला जीव लावणारे होते. वैभव ने केलेल्या प्रश्नांच्या सरबत्ती नंतर सागर... अरे हो हो...☺️ सांगतो जरा धीर धर, सांगतो सगळं भावा.... चहा तर घे आधी म्हणत चहा चा ग्लास पुढे केला. इकडे भावनाने हातात घेतलेले पुस्तकाचे पान नि पान चाळून झाले होते. इच्छा नसताना ही उठून अंघोळ करून चहा पिण्या करिता किचन मध्ये जाऊन आई... चहा दे ग जरा.. डोकं खूप दुखतंय माझं असे म्हणत तिथेच बसली. आईने ही तिला लगेच मस्तपैकी आलं वेलची पूड टाकून चहा करून दिला. दिलेला चहा पिऊन बाहेर हॉल मध्ये आली होती.
इकडे सागर ने वैभव ला त्याच्या आणि भावनाच्या नात्या बद्दल सारकाही अगदी पहिल्या भेटीपासून ते आदल्या दिवशी पर्यंतचे सगळं काही सांगितले. वैभव आश्चर्याने त्याच्या कडे पाहतच ओह.... आपण तर आमच्या ही पुढे गेलात की राव... आपण तर लव गुरू झालात. आम्हाला ही शिकवा जरा कसं पटवायचं पोरींना? म्हणत हसतच☺️ त्याला हात जोडले. सागर ने वैभव ला हे सारे सांगण्या आधी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नाही आणि सध्या सांगू ही नकोस असे त्याच्या कडून वचन घेतले होते. साऱ्या गप्पा मारून झाल्यावर निघताना आयला... सागर काहीही म्हण.. वहिनी दिसायला भारीच आहेत रे असे वैभव म्हणाला. सागर ने हसतच☺️ हो रे... आहेच ती सुंदर तिच्या कधी प्रेमात पडलो हे मलाच कळले नाही. असे म्हणत दोघे ही बाईक वर बसून घरी जाण्यास निघाले होते.
वैभव बरोबर गप्पा मारल्याने सागर जरा नॉर्मल झाला होता, पण बाईक वर घरी जाताना वैभव शी गप्पा मारताना भावना शिवाय सागर कडे दुसरा कोणता विषयच नव्हता. गप्पांच्या नादात घर कधी आले हे सागरला कळले ही न्हवते. सागर ला सोडून वैभव जाता जाता, संध्याकाळी भेटुयात.. नेहमीच्या ठिकाणी.. असे म्हणत निघून गेला. इकडे भावना सागर पोहचला असेल ना घरी? याची खातरजमा करण्या करिता सागरच्या घरी फोन करूयात की नको? या विचारात होती. असे ही कोल्हापूूूर सोडल्या पासून भावनाने सागर सोबत असल्याने शुभदा ला फोन ही केला नव्हता, जवळ जवळ विसरलीच होती. असे ही शुभदा तिच्या वर चिडणार ह्याची तिला जाणीव होतीच. शुभदा शी बोलता बोलता सागर पोहचला की नाही याचा अंदाज ही येईल असे विचार करून शेवटी तिने शुभदाच्या घरी फोन केला. फोनची रिंग वाजत होती, आणि फोन ही शुभदा नेच उचलला होता. हाय शुभदा कशी आहेस असे म्हणताच, काय ग तुला मी आत्ता आठवली का? काहीच बोलू नकोस माझ्या शी. भावनाला ती खूप चिडली आहे याचा अंदाज आला होता, सॉरी ग शुभदे... ए प्लीज ऐक ना जरा माझं असे म्हणता, पण ती काही ऐकायला तयारच न्हवती, मी तुझ्या घरी तू पोहचलीस की नाही? यासाठी फोन केला होता, पण काकूंनी उचलला त्यांच्या कडून कळले तू पोहचलीस ते. आणि तू घरी नसतेच असे ही काकू म्हणाल्या. अग शुभदा हो जरा बिझी होते ग.. त्यामुळे नाही केला तुला फोन, सॉरी म्हणतेय ना मी तुला. इतक्यात शुभदा आई ग... सागर आला आहे ग म्हणाली. भावनाने हे ऐकले आणि तिचा जीव भांड्यात पडला होता.
शुभदा ने तिच्या आईला सागर आला आहे हे सांगताना भावनाने कळत नकळत ऐकले होते, त्यामुळे भावना चा खऱ्या अर्थाने जीव भांड्यात पडला होता. शुभदा मात्र अजून ही चिडलेलीच होती. भावनाने अनेकदा शुभदा ची माफी मागितल्या नंतर बऱ्यापैकी तिचा राग शांत झाला होता. आणि आता जरा तिच्या शी नॉर्मल बोलायला लागली होती. काय ग.. शुभदे एवढं रागवायचं असतं का?.., माझं काहीच ऐकून घ्यायला तयार न्हवतीस, मला किती वाईट वाटलं.. असे भावना म्हणताच, नाही ग भावना... तस नाही पण निदान एक तरी फोन करायचा होतास ना मला, याआधी तू असं कधीच वागली न्हवतीस म्हणून जराशी चिडली होती मी☺️ असे शुभदा म्हणताच, भावना हो का?..शुभदे तू भेट ग मला तुला तर मी बघणारच आहे. असे भावना म्हणताच शुभदा 😊 हसतच मग ये ना इकडे.. बोलताच दोघी ही 😊😊हसायला लागल्या होत्या. बऱ्याच दिवसा नंतर दोघी एकमेकींशी बोलत होत्या, त्यामुळे बराच वेळ मनसोक्त गप्पा मारत होत्या.
इकडे सागर त्याच्या रूम मध्ये जाऊन अंघोळ करून आला अन सोफ्या वर मुद्दामहून येऊन बसला होता, आणि जाणून बुजून भावनाला कळावे म्हणून तिथूनच आईला जोरात आवाज देऊन आई ग... नाष्टा दे.. भूक लागली आहे कालपासून काहीच खाल्ले नाही असे सांगत होता. भावना ने ही शुभदा ला विचारलेच काय ग.. काय झाले सागरला ओरडायला? तशी शुभदा ही भावनाला तूच विचार त्याला असे म्हणत तिने सागर कडे फोन दिला. तसा सागर ने तिच्या कडून फोन घेत तिच्या शी बोलू लागला होता, इकडे मात्र भावना जरा शुभदा च्या कृतीने गडबडली होती. पण सागरचा आवाज ऐकून तिला समाधान वाटले होते, काय बोलू त्याच्याशी हेच सुचत नव्हते, जेमतेम बोलून सागर ने ही लगेच शुभदा कडे फोन दिला. गप्पांची सांगता करत दोघींनी बाय.. लव्ह यू, मिस यू म्हणत फोन ठेवले होते. सागर चा आवाज ऐकून भावनाला आनंद झाला होता, बऱ्यापैकी ती आता नॉर्मल झाली होती. आणि असे ही ठरल्या नुसार उद्या येणाऱ्या मंगळवारी ते फोनवर बोलणार असल्याने भावना खुश होती. त्या आनंदात बेड वरील उशी (पिलो) हाती घेऊन आपल्या छातीला कवटाळून गोल फिरत प्रेमावरील (त्या हॉटेल च्या रूम वर रोमँटिक मूड मध्ये असताना टीव्हीवर सुरू असलेले "तुम मिले.. दिल खिले और जिने को क्या चाहीये") हे गाणं गुणगुणत होती, मधेच स्वतःलाच आरशात पाहून लाजत होती. खऱ्या अर्थाने प्रेमात पडल्यावर काय होत असते हे ती प्रत्यक्ष अनुभवत होती. तिच्या गालावरची कळी खुलली होती. भावना ची आई आपली लेक आनंदी आहे नॉर्मल झाली हे पाहून त्याही खुश होत्या. दुपारचे जेवण घेऊन रात्रभर जागरण झाल्याने भावना जराशी वामकुक्षी घेण्यासाठी आपल्या रूम मध्ये जाऊन बेडवर आडवी झाली होती.
इकडे सागर नाष्टा करून आपल्या बहिणीशी म्हणजेच शुभदा शी गप्पा मारत बसला होता. गप्पा मारल्या नंतर रानात फेरफटका मारण्या करिता गेला. दोन तीन दिवस तो इथे नसल्याने पिकं नीट आहेत ना.. सारकाही सुरळीत आहे याची खातरजमा करून सागर रानातल्या घरासमोरील जागेत लाकडी काथ्याची बांधणी असलेल्या कॉट वर निवांत आडवा झाला होता. सळसळणाऱ्या उसाच्या त्या पात्त्यांचा आवाज कानाला मंजुळ वाटत होता. त्या मंजुळ आवाजाने सागरला भावना त्याच्या बरोबर रान बघायला आली असताना चे सारेकाही आठवले होते, तिचा तोल जाऊन ती पडता त्याने तिला सावरता तिचे ते अलगद पडणे अन तो पदर सरकता त्याचे नकळत तिच्या अंगावर पडणे अन एकमेकांत गुंतने हे आठवून त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या हास्याने सागर ने कूस बदलत स्वतःहा त्या आठवणींमध्ये रममान झाला होता. यात कधी सांज झाली हे त्याला ही कळले नव्हते.
इकडे भावनाला कधी उद्याचा दिवस येतो आणि कधी त्याच्याशी बोलेन असे झाले होते. संध्याकाळ होताच चहाचा कप घेऊन चहाचा झुरका घेत बाल्कनीतून डोळ्यांना सुखावणारा नयनरम्य सूर्यास्ताचा नजारा बघत होती. इकडे सागर तिच्या आठवणीत रमला होता. संध्याकाळ झाल्याने पाखरांची घरट्याकडे परतताना त्यांची किलबिल सुरू झाली होती. त्या आवाजाने सागर भानावर आला आणि घरी जाण्यासाठी निघाला. जाता जाता वैभव आणि इतर मित्रांना भेटून घरी परतला होता. रात्रीचे जेवण सर्वांबरोबर घेऊन सागर आपल्या रूमवर जाऊन झोपी गेला होता. भावना ने ही रात्री जेवताना आई वडिलांशी गप्पा मारून तिच्या रूम मध्ये झोपण्या करिता गेली.
सागरच्या गोड आठवणीत भावना ला कधी झोप लागली हे तिला ही कळले नाही. सकाळी आईने खिडकीचा पडदा उघडल्याने खिडकीतून चेहऱ्यावर पडलेल्या उन्हाच्या किरणांनी भावनाला जाग आली होती. बिछान्यात उठून बसली अन चेहऱ्यावरील हास्या सोबत तिने आईला गुड मॉर्निग म्हणत आपला बिछाना सरळ करत पांघरुणाची घडी घातली. सकाळच्या सर्व विधी उरकून नाष्टा करण्या करिता हॉल मध्ये येऊन बसली होती. इकडे सागर ही सकाळी लवकर उठून शेतातली कामे करण्यास गेला होता. सकाळची सर्व कामे उरकून मित्रांसमवेत गप्पा मारून घरी निघाला. घरी पोहचताच सागर ने अंघोळ अन पोटभरून नाष्टा करून भावनाला फोन करण्या करिता बाईक वरून आपल्या मित्राच्या फोन बूथवर जाण्यास निघाला. इतक्यात शुभदाने सागरला आवाज देत थांबवले आणि कोल्हापूरच्या मार्केट मध्ये मला सोड असे सांगताच, सागर ला तिला काय म्हणावे काहीच सुचत नव्हते, याच विचारात असताना शुभदा त्याच्या बाईक वर येऊन बसलीही. आता मात्र सागरला तिला सोडण्या शिवाय त्याच्याकडे कोणता पर्यायच उरला नव्हता. एक वाजता भावनाला फोन करायचा असल्याने वेळ कशी साधायची याच विचारात सागर बाईक चालवत होता.
इकडे भावना सायली कडे जाण्या करिता तयारी करत होती. निघण्यापूर्वी सायलीला फोन करून आठवण करून दिली, आणि चुकून ती पोहचण्याच्या आत जर सागर चा फोन आला तर त्याला थांबवण्यास सांग असा निरोप ही तिच्या जवळ दिला होता. काही वेळातच भावना निघणार होती. इकडे वेळ साधण्यासाठी सागर वेगाने बाईक चालवत होता, सागर आणि शुभदा मार्केट ला पोहचले होते. तु तुझी काय ते खरेदी कर मी माझं एक महत्वाचे काम उरकून येतो असे म्हणत सागर माघारी फिरला आणि मित्राच्या बूथ वर जाण्या करिता निघाला. इकडे भावना सायलीच्या घरी पोहचली होती, आणि त्याच्या फोन ची वाट पाहू लागली होती. ठरल्या वेळेनुसार एक वाजता बोलणार होते, दीड वाजुन गेला होता पण सागर चा फोन काही आला नव्हता. जस जसा वेळ जात होता भावना च्या मनाची घालमेल वाढू लागली होती. दोन वाजून गेले होते तरी सागर चा फोन न आल्याने भावनाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. इकडे सागरला कधी एकदाचा पोहचतो आणि भावनाला फोन करतो असे झाले होते. पुढच्या पंधरा मिनिटात सागर मित्राच्या फोन बूथ वर पोहचला होता, इकडे भावना दुःखी मनाने सायलीचा निरोप घेऊन जाण्याच्या तयारीत होती. सायली ही तिला डोर पर्यंत सोडण्या करिता आली होती. सागरने कशीबशी बाईक लावून सायलीच्या घरी फोन केला, फोनची रिंग ऐकून सायली ने भावनाला आवाज देऊन थांबण्यास सांगितले फोन वाजतोय नको जाऊस?.. कदाचित त्याचाच फोन असेल असे म्हणताच भावना पळतच त्या फोन जवळ आली होती, आणि फोन उचलून हॅलो कोण? असे विचारता पलीकडून मी सागर बोलत आहे असे शब्द कानी पडताच भावनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. काय रे सागर... किती वाट पहायला लावलीस? मी निघालीच होती, अजून मिनिटभर जरी उशीर केला असतास ना.. तर आपली फोन वर भेट नसती झाली. सागर ने होय ग.. झाला जरा उशीर.. सॉरी म्हणत अग तुलाच फोन करायला निघालो होतो, पण ताईने तिला मार्केट मध्ये सोडायला सांगितले, त्यामुळे तिला सोडून पुन्हा इकडे आलो तुलाच फोन करायला. तुझ्या शी बोलून तिला घ्यायला परत जाणार आहे म्हणून आज गडबड झाली. ते जाऊ देत तू कशी आहेस? मला तर तुझ्या शिवाय करमतच नाही ग? काल शेतात होतो, तू त्यावेळी पडली होतीस.. आठवतंय ना तुला.. ते सार काही आठवले☺️आठवलं काय.. ते तर माझ्या डोळ्या समोर पुन्हा घडल्या सारखे भासत होते ग. तुझ्याच आठवणीत रमलो होतो. अग तू बोल ना? काहीच का नाही बोलत?
अरे हो हो... तू बोलून देेशील तर ना?☺️☺️ हसतच भावना त्याला म्हणाली होती. काही नाही रे.. त्या दिवशी मी तुझ्याच आठवणीत रात्रभर तळमळत होते. काहीच सुचत नाही रे. ये ना भेटायला येशील का रे? सागर.. आता लगेच कसे येऊ मी पुढच्या महिन्यात प्रयत्न करेन.असे म्हणाला. ठीक आहे सागर.. पण नक्की ये मी तूझी आतुरतेने वाट पाहत आहे असे भावनाने त्याला सांगताच, हो नक्की तुला भेटून जाईन चल ठेऊ का आता फोन?.. तिकडे ताई वाट पाहत असेल.. हो हो चल बाय काळजी घे, लव्ह यू सागर असे म्हणताच पलिकडून सागर ने ही आय लव्ह यू टू असे म्हणत फोन ठेवला. पवन त्याचा मित्र त्याच्या कडेच बघत होता. सागर ने त्याला काय ☺️ असे म्हणत नंतर सांगतो , कोणाला बोलू नकोस असे सांगून शुभदा ला घेण्यास पुन्हा निघाला. इकडे भावना ने सायलीला आनंदाने मिठी मारून थंक्स सायली असे म्हणत चल मी येते म्हणत निघाली. सागरची बहीण शुभदा त्या रणरणत्या उन्हात त्याची वाट पाहून वैतागली होती. अर्धा पाऊण तासात सागर पोहचला होता. त्याला पाहताच काय रे सागर? एवढा उशीर का रे.. कसलं काम होत तुझं.. असे म्हणत शुभदा बाईक वर बसली आणि चल आता शहाण्या.. लवकर असे म्हणाली तसे सागर सॉरी ग ताई... खरचं खूप महत्वाचे काम होते ग.. त्यामुळे वेळ झाला असे म्हणत सागर ने बाईक सुरू करून दोघे ही घरी जाण्यास निघाले.
कथा :- नकळत सारे घडले -5
सागर आणि शुभदा घरी पोहचले होते. बाईक वरून उतरताच शुभदा ने सागरला तिच्या हातातल्या काही बॅग घेण्यास सांगितले आणि काही स्वतः घेऊन घरात आली, तिच्या पाठोपाठ सागर ही बॅग घेऊन आत आला होता. आत येताच शुभदा ने तिच्या आईकडे... आई ग.. हा शहाणा आज मला मला तसाच मार्केटला सोडून गेला आणि लगेच येतो असे म्हणत जवळ जवळ दोन तासाने आला, दोन तास मी त्या मार्केट मध्ये उन्हात उभी होती याच्यामुळे, आई विचार याला असे कसले काम होते याला?.. जो हा दीड शहाणा मला सोडून गेला. अशी सागर ची तक्रार केली. आईने ही दखल घेत काय रे.. अस कसलं काम होत रे सागर जो तू तिला एकटीला सोडून गेलास? अरे काय रे... मी तुला विचारत आहे, बोल काहीतरी.. अग आई खरच महत्वाचे काहीतरी काम होते मी घरातून त्या साठीच निघालो होतो, पण ताई मला थांबवून मार्केट ला सोड अशी म्हणाली तरीही मी तिला नाही असे न म्हणता सोडले ना.. यात माझं काय चुकलं आता तुच सांग? काय ग शुभदे ऐकलस का? आता झालं समाधान असे आई म्हणताच .. मग त्याने आधी का नाही सांगितले म्हणत शुभदा वैतागून तिच्या रूम मध्ये निघून गेली.
इकडे भावना सायलीचा निरोप घेऊन घरी जाण्या करिता निघाली होती. आज सागर सोबत बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. घरी पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. मस्तपैकी फ्रेश होऊन किचन मध्ये जाऊन स्वतः साठी आणि आई करिता चहा टाकला चहा तयार झाल्यावर कपात चहा ओतून त्या दोन्ही चहाच्या कपात दुधावरली साय टाकून आईला देऊन स्वतः बाल्कनीत संध्याकाळच्या त्या रम्य नजाऱ्यासोबत चहाचा आस्वाद घेत बसली होती. चहा घेत असताना आपण आपल्या अत्यंत जिवलग मैत्रीण शुभदा ला आपल्या प्रेमाबद्दल अजून काहीच सांगितले नाही, तिला इतरांकडून कळण्या पेक्षा आपणच सांगितलेले कधी ही योग्यच असेल असा विचार तिच्या मनात घोळत होता. मावळत जाणाऱ्या सुर्याबरोबर तिच्या कपातला चहा देखील संपत आला होता. चहाचा शेवटचा घोट घेत तिने तिचा निर्णय देखील घेतला होता, तो म्हणजे आपल्या जिवलग मैत्रिणीला तिच्या आणि सागरच्या नात्या बद्दल सांगायचे. भावना तडक उठली आणि आई बाजारात गेली असल्याने फोन करण्यासाठी हॉल मध्ये येऊन शुभदा चा नंबर डायल केला. पलीकडे रिंग होताच तो फोन शुभदा च्या आईने उचलला होता, शुभदा ला आवाज देत ती येईपर्यंत काकू भावना सोबत बोलत होत्या. शुभदा येताच तिच्या कडे फोन देत शुभदा ची आई स्वयंपाकाची तयारी करण्या करिता निघून गेल्या. फोन घेताच शुभदा ने काय ग भावना कशी आहेस? मला वाटले तू विसरलीस की काय?☺️ असे विचारता भावना अजिबात नाही ह... मीच तुला फोन केलाय ☺️ कळले का? असे म्हणता दोघे ही खदखदून 😊😊 हसल्या. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर भावना ने महत्वाच्या मुद्यावर बोलावयास सुरवात केली. शुभदा मला तूला महत्वाचे काहीतरी सांगायचे आहे, कृपया चुकीचा अर्थ किंव्हा राग येऊ देऊस नकोस, शांतपणे ऐकशील ना शुभदे? असे म्हणताच.. शुभदा नाही ग.. चिडणार आणि राग कशाला येईल, तू काय ओळखत नाहीस का मला? बोल ग बिनधास्त बोल. असे शुभदा म्हणताच भावना ने सुरवात केली. शुभदा ने अडखळतच मी.. म्हणजे मला.. असं म्हणायचं आहे की.. मी ना.. मी की नाही.. सागरच्या.. प्रेमात पडली आहे ग.. प्लिज प्लिज राग नको येऊ देऊस.. शुभदा ने आश्चर्य चकित होऊन.. काय? तू.. आणि सागरच्या प्रेमात...☺️ काय बोलतेस.. काय तू? आणि सागर पण तुझ्या... प्रेमात पडला आहे की काय? असे विचारता ... भावना होय ग शुभदे... प्लिज चिडू नकोस,.. आधी शांत ऐकून घे ग.. मग तुला काय रागवायचे ते रागव असे म्हणताच, भावना अग तू खरचं सांगतेस ना? हो शुभदा आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो ते आम्हालाच कळले नाही, पण हे अगदी खरं आहे. तुला कसे सांगायचे याच विचारात मी गेले कित्येक दिवस होते , पण आज ठरवले की तुला सारकाही सांगून मला माझ्या मनातील होणारी घुसमट दूर करायची होती.
भावनाला जसे वाटत होते त्याच्या अगदी उलट शुभदा हे सारं सारकाही शांतपणे न चिडता ऐकत होती याचे तिला आश्चर्यच वाटत होते, आणि समाधान ही वाटत होते. शुभदा ने.. अग वेडाबाई मला तू इकडे असतानाच तुझ्यातला हा बदल प्रकर्षांने जाणवला होता, पण तुझ्याच तोंडून हे ऐकायचं होत मला म्हणून मी तुला काहीच विचारले नव्हते. आणि तू या घरात आलीस तर उलट मला खरच खूप आनंदच होईल. भावनाला शुभदाचे हे बोलणे ऐकून खूप आनंद झाला होता आणि मनातला सारा तणाव क्षणात दूर झाला होता. या आनंदातच शुभदा तू खरंच ग्रेट आहेस मला समजून घेतलंस आणि आमच्या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार ही केलास☺️ आय लव यू शुभदे...खरंच मनापासून थँक्स☺️.. तुला नाही माहीत मला आज किती आनंद झाला आहे, आणि तू आज माझ्या मनावरचे ओझे किती कमी केलेस ते. असे म्हणत भावनाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
भावनाने आपले मनोगत व्यक्त केल्यावर शुभदाने अग भावना हो.. हो.. किती वेळा आभार ह☺️... सगळं खरं आहे ग.. पण आई आणि बाबा आहेत की? त्यांना कोण आणि कसं सांगणार? त्यांचा पण होकार घ्यावा लागेल, आणि मला फक्त एकच अडचण वाटत आहे ती म्हणजे तू त्याच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहेस. असो त्याचा विचार आता नको करायला.. पण तुझं नक्की आहे ना भावना?.. आणि तू सागरशीच लग्न करणार आहेस ना?. आणि महत्वाचे म्हणजे तुझ्या आई बाबांचे काय? असे अनेक प्रश्नांची मालिका तिच्या समोर ठेवल्याने भावना भंडावून गेली होती. तिला काहीच सुचत न्हवते. किती मी आनंदात होते आणि हे काय शुभदे.. तूझ्या या प्रश्नांमुळे मी चक्रावून गेली आहे. जाऊ देत.. त्याचा आत्ताच नको विचार करायला. असे म्हणत भावना ने मनोगत व्यक्त केले. शुभदाने भावनाला.. काय ग भावना तू हे माझ्या शी तुम्हा दोघांबद्दल जे काही बोललीस ते सागरला माहीत आहे का ग? होय ग... मी तुझ्या शी आमच्या दोघांबद्दल बोलणार हे त्याला माहीत आहे, पण आज बोलणार होते हे त्याला नाही सांगितले. पण का ग? असं का विचारत आहेस तू? असे भावनाने तिला विचारले असता, अग काही नाही, नको घाबरुस जरा त्याची खेचायची असा विचार करतेय मी. अग आज दुपारी ना.. मला मार्केट ला सोडून लगेच येतो म्हणून जो गेला तो दोन तासानेच आला ग शहाणा, भर उन्हात मी आडोश्याला उभी होती. असा राग आला होता तुला काय सांगू? आता त्याला बघतेच मी. असे म्हणताच ए शुभदा.. नको ग.. त्याला असे सतावूस त्याला खूप टेन्शन येईल ग.. आणि आज दुपारी म्हणजे दर मंगळवारी आम्ही फोनवर भेटणार असे आमचे ठरले आहे आणि मी त्याची वाट पाहत होते ग.. मलाचं फोन करण्यासाठी त्याने हे केले होते ग.. प्लिज नको त्याला त्रास देऊस असे म्हणता ओह.. अरे बापरे आत्ता पासूनच त्याची बाजू घेतेस ह.. तू तर माझी मैत्रीण आहेस ना☺️ लगेच विसरलीस की काय☺️ असे हसतच तिने भावना ची मस्करी केली. नाही ग.. अस काही नाही.. तू आज ही माझी मैत्रीण आहेस आणि कायमच असणार. असे म्हणत दोघं ही मनापासून हसल्या. ऎक भावना.. आज मी सागरची खेचणार आहे, तुम्हा दोघांबद्दल कळले आहे आणि यावरून त्याची चांगलीच गंम्मत करणार आहे तू फक्त त्याला काही सांगू नकोस प्लिज ह.. आणि तुला माझी शपथ आहे. बर बाई हो.. नाही सांगत पण जास्त नको त्रास देऊस त्याला असे भावनाने तिला सांगितले.
पुन्हा एकदा भावनाने शुभदे थँक्स माझ्या आणि सागरच्या प्रेमाला तू मोकळ्या मनाने स्वीकारलेस आणि असेच आमच्या बाजूने शेवट पर्यंत रहा असे म्हणत आभार मानले. शुभदा ने पण अग तुला अस कस वाटले की मी तुला विरोध करेन. फक्त तुम्ही दोघे शेवटपर्यंत तुमच्या निर्णयावर ठाम रहा. असे म्हणत चल बाय.. आणि हो भावना तू मला सर्व सांगितलंस हे सागरला कळू देऊ नकोस म्हणताच, अग हो ग बाई.. नाही सांगत त्याला मी. आणि बाय म्हणत फोन ठेवले दोघींनी. फोन ठेवताच शुभदा तिच्या रूम वर जाऊन या दोघांबद्दल म्हणजेच त्यांच्या नात्याबद्दल विचार करू लागली होती. तिचे आई वडील हे नातं स्वीकारतील का?, सागर तिच्या सोबत असेल की त्याचे मत बदलेल. असे प्रश्न तिच्या मनात घोळत होते. पण सागरच्या आयुष्यात भावना आल्याने ती ही खुश होती. सागरची आजच मस्करी करायचे तिने ठरवले होते. सागर यायची वाट पाहत होती. बराच वेळ होऊन ही सागर आला नव्हता. संध्याकाळ होऊन गेली होती. रात्रीच्या जेवणाची वेळी सागर आला होता. हातपाय धुऊन सागर सगळ्यां सोबत जेवायला बसला होता. शुभदा ने सागरला जेवण झाल्यावर मला तुझ्या शी जरा मह्त्वाचे बोलायचे आहे टेरिस वर चल असे म्हणत ती टेरिस वर निघून गेली होती. ताई अशी काय बोलणार आहे, याच विचारात सागर टेरिसवर जाण्यास निघाला होता. टेरिसवर शुभदा त्याची वाटच पहात होती. सागर वर आलेला कळताच जरा मोठ्या आवाजात सागर इकडे ये लवकर असे शुभदा ओरडली असता सागर चांगलाच दचकला होता.
शुभदाच्या या कृतीने सागर चांगलाच घाबरला होता. सागरच्या मनात आमच्या दोघां बद्दल ताईला इतरांकडून कळले तर नसेल ना? या प्रश्नाने घर केले होते. आणि ही शंका खरी ठरली तर हे कसं सांभाळून घ्यायचे याचा विचार करत तो तिच्या समोर येऊन उभा राहिला होता. सागर समोर येताच प्रचंड राग चेहऱ्यावर आणून काय रे तू माझा भाऊ असून असा कसा वागलास रे?, मी जे काही ऐकले आहे ते नक्की खर आहे का?, मला लाज वाटतेय तुला भाऊ म्हणून घ्यायची असे रागमाळ वाहता सागर चांगलाच हबकला होता, पण हिला नक्की काय समजले आहे हे त्याला कळले नव्हते. सागरने एकदम दबक्या आवाजातच अ ताई... तुला काय झाले आहे रागवायला आणि असे तुला माझ्या बद्दल काय कळले आहे? ते तरी सांग ना.. काही चुकल आहे का माझं? असे म्हणताच, शहाण्या तू असा असशील मला वाटले पण नाही. आज पासून तू मला ताई पण म्हणू नकोस, आणि मी हे सगळं आई बाबांना आज सांगणार आहे, आता तेच ठरवतील तुझ्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो?. ए.. ए ताई.. अस नको ना बोलूस तुला इतका राग येण्या सारख मी काय केलं आहे ते तरी सांग ना? ग.. असे म्हणत सागर ने तिचा हात पकडत मार... मार मला हे घे.. माझा गाल तुझ्या समोर आहे, पण सांग ना ग ताई असे म्हणत तिच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला.
शुभदा ला हसू येत होते त्याची मस्करी करताना , पण स्वतःच्या हसण्यावर ताबा ठेवत त्याची ती खेचत होती. सागर मला इतरांकडून कळले आहे की.. तुझं आणि... असे म्हणत मुद्दामहून जरा वेळ थांबत सागर ला अजून टेंशन दिले असता अग ताई.. सांग ना आता तरी असे म्हणता शुभदाने.. मला तुझ्या आणि भावनाबद्दल जे काही कळाले आहे ते कितपत खरं आहे? असे विचारले असता सागर चांगलाच दचकला होता, यावर कायं आणि कसे सांगावे या गोंधळात सागरने चाचपडत तुला हे कोणी सांगितले?, आणि अजुन काय कळले आहे? असे म्हणता शुभदा ने ही होय.. बरच काही कळाले आहे आणि ती माझी जिवलग मैत्रीण असताना तू असा कसा वागलास रे.. सांग ना हे सगळं खरंच आहे ना? आता मी आई ला सर्व सांगणार आहे असे म्हणत खाली आई कडे जाण्यास काही पाऊले पुढे टाकत जाण्याचे नाटक करू लागली. ताई आईला सांगण्यास निघाली हे बघताच ताई.. थांब ना.. अस नको करुस.. होय.. खर आहे हे.. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ग, ती तुला सांगणारच होती, पण मीच तिला आत्ताच नको सांगू असे म्हणालो होतो. होय मला मान्य आहे ती तुझी मैत्रीण आहे ग.. पण माझं तिच्यावर खरंच प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे, प्लिज ताई.. घे ना समजून... नाहीतर तू एक काम कर ना ताई तू.. तू की नाही..तिलाच फोन करून विचार, ती पण तुला हेच सांगेल. आमचं खरच मनापासून प्रेम आहे ग ताई असे म्हणत त्याने ताईची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. शुभदाला मात्र खूप मजा येत होती सागरची ही अवस्था पाहून. बराच वेळ सागरने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने सागर ला आपल्या हाताने उठवत 😊😊 हसत अरे वेड्या.. खरच वेडा आहेस तू, मला भावनाने सारकाही सांगितले आहे.. तुमच्या बद्दल, मी तुझी मस्करी केली रे जरा, मला आज दुपारी मार्केट मध्ये उन्हात उभे राहायला लागले ना तुझ्या मुळे, म्हणून तिला सांगूनच तुझी खेचली. डोळे पुसत सागर जरा तणावरहित झाला होता. आणि काय ग ताई .. ही असली मस्करी करतात का कोणी? असे म्हणत खरंच ताई तुला राग नाही ना आला आमचा, आम्हाला तुझा सपोर्ट आहे ना? ग ताई, तूच आता आमचा आधार आहेस, करशील ना मदत आम्हाला असे म्हणताच होय रे वेड्या.. नक्की करणार तू फक्त माझ्या भावनाला धोका नको देऊस.. बस बाकी काही नाही. असे म्हणत त्याच्या डोक्यात टपली मारत चल आता खाली असे म्हणत शुभदा उठली होती. ताई ने त्यांच्या दोघांच्या प्रेमाला होकार दिल्याने सागर खुश होता. ताई थँक्स तू आम्हाला समजून घेतलंस, तू खुप चांगली आहेस ग.. असे म्हणता हो का.. बस.. बस मस्का नको मारुस असे म्हणत दोघे ही खाली आले होते.
सागर आणि शुभदा दोघे ही खाली आले होते. खाली येऊन हॉल मधल्या सोफ्यावर बसले. बाजूच्याच सोफ्यावर त्यांचे वडील बसले होते, दोघे ही सोफ्यावर बसताच काय रे काय काम होते, एवढं काय गुपित आहे कळू तर दे आम्हाला असे विचारता शुभदा ने ☺️ हसतच नजरेनेच सागरला काय रे... सांगू का? सगळं असे सागरला खुनावताच सागर काहीही न बोलता नको असे मान हलवतच मूक नकार देत गप्प बसला होता. शुभदा ने ही लगेचच काही नाही बाबा.. असं काही नाहीं, आम्ही सहजच वरती गेलो होतो असे सांगितले. काही वेळानंतर वडील बाहेर गेल्यानंतर सागर शुभदा जवळ जाऊन काय ग ताई.. बाबा.. वरती आले होते का? असे विचारले, शुभदा ने नाही रे.. माझं लक्ष होते नाही आले, आपली मस्करी केली असेल त्यांनी असे सांगितले असता सागरच्या मनावरचा ताण कमी झाला होता. सागरने इकडे तिकडे पाहत हळूच काय ग ताई.. होईल ना सारे मनासारखं? आई बाबांची हे कळल्यावर काय प्रतिक्रिया आणि निर्णय असणार आहे? काय माहीत असे म्हणता शुभदा ने☺️ हसत.. त्याचे आत्ताच कशाला टेन्शन घेत आहेस, जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू आपण. ए.. आज संध्याकाळी मी भावनाला फोन करणार आहे तू बोलणार आहेस का?, की तुझा काय निरोप असेल तर देईन तिला असे म्हणता, सागर काही नाही ग ताई असे म्हणाला. ओह मी विसरलीच की तुम्हाला खाजगी बोलायचे असेल नाही का?😊😊 असे हसत तिने सागर ची थट्टा केली. काय ग ताई... असं काही नाही म्हणत तिथून निघाला.
सागरने आई ला हाक देत मी रानात निघालो आहे रानातून काही आणायचे आहे का? असे विचारले असता, हो हो.. थोडी फार भाजी आणि हिरव्या मिरच्या जरा जास्तच आण, खरडा करायचा आहे असे आईने सांगताच रानाकडे निघाला. रानातील सर्व कामे उरकून आईने सांगितल्यानुसार भाजीपाला आणि मिरच्या तोडून निवांत बसला होता. इकडे शुभदा ने भावनाला फोन केला असता भावना घरीच असल्याने फोन तिनेच उचलला अन हॅलो भावडे काय मग.. काय करतेस?.. मी ना☺️ मी मजेत.. आहे शुभदे तू सांग कशी आहेस? मी पण मजेत आहे. भावना आज मी की नाही... सागरची चांगलीच खेचली ग.. तुला काय सांगू☺️ काय त्याचा चेहरा झाला होता ग.. अगदी रडकुंडीला आला होता शेवटी रडलाच ग☺️.. खरंच तू बघायला हवे होते. ए काय ग शुभदे.. का त्याला तू रडवलेस?.. हो हो.. मॅडम काय हे प्रेम आहे ☺️☺️ असे म्हणत तिने तिची सुद्धा खेचली जरा... पण काहीही म्हण मला खूपच मजा आली. पण तो रडायला लागल्या वर मात्र मी त्याला सांगितले मला सर्व काही तूच सांगितले तेव्हा जरा त्याच्या जीवात जीव आला होता. मग जरा मोकळ्या मनाने बोलू लागला, भावना माझा भाऊ खरच तुझ्या वर मनापासून प्रेम करतोय ग, त्याला.. मी आहे तुझ्या पाठीशी पण तिची साथ तू मात्र सोडू नकोस असे ही सांगितले आहे. शुभदे... खरच तू खूपच चांगली आहेस ग आम्हाला समजून घेतलंस आणि तुझी साथ ही आहे. मी पण तुला शब्द देते की.. मी पण त्याला कधीच सोडणार नाही, शेवटपर्यंत मी त्यासोबत असेन, ट्रस्ट मी असे भावना म्हणाली. अग भावना होय ग.. मला माहीत आहे ग. आता फक्त ही दोन तीन वर्षे सांभाळून रहा, याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नकोस. हुशार आहेस म्हणून सांगतेय मी. होय शुभदे नको करुस काळजी मी याचा माझ्या अभ्यासावर परिणाम नाही होऊ देणार, आणि त्याला ही नाही दुखवणार असे भावना म्हणत तिने ही शुभदा ला शब्द दिला. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर काय मग मॅडम भावना.. आपल्या प्रियकराला काय निरोप वैगेरे द्यायचा आहे का?☺️☺️ असे हसतच विचारले असता भावनाने ही ☺️☺️ हसतच काही निरोप वैगेरे नाही ह.. मॅडम असे भावना म्हणाली. आणि काय ग घरात कोणी नाही वाटतं म्हणूनच इतकी बिनधास्त बोलत आहेस, होय ना☺️. असे विचारता शुभदा ने ही ☺️ हसतच होय ग कोणीच नाही म्हणूनच तर एवढी बिनधास्त बोलली मी, असे म्हणत चल बाय ठेवते फोन आता काळजी घे म्हणत शुभदाने फोन ठेवला. फोन ठेवायला अन सागरची यायची वेळ एकच झाल्याने, अरे रे.. सागर हे बघ.. आत्ताच फोन ठेवला मी थोडक्यासाठी चुकामुक झाली. करायचा असेल तर कर फोन, घरात कोणीच नाही असे शुभदा म्हणताच, असू देत ☺️ असे ही आम्ही मंगळवारी दुपारी बोलणारच आहोत असे सागर म्हणत त्याने आणलेला भाजीपाला अन मिरच्या हॉल मध्ये ठेवत नेहमीच्या कट्टयावर मित्रांना भेटावयास गेला.
सागर त्यांच्या मित्रांसोबत कट्टयावर गप्पा मारत बसला होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर इतर मित्र निघून गेले होते, वैभव ही निघत असता सागरने त्याला अरे वैभ्या थांब की लगा काय घाई आहे का?.. बोलायचंय तूझ्याशी. अरे काय नाय रे सगळेच निघाले म्हणून मी पण निघालो होतो. बोल ना काय बोलायचे आहे. असे वैभव म्हणता, अरे भावनाने ताई ला सगळं आमच्या बद्दल सांगितले, आणि तुला माहितेय का?.. ताईला कळल्यावर ती माझ्यावर चांगलीच चिडली होती रे.. माझे तर धाबेच दणाणले होते, पण बराच वेळानंतर तिने मस्करी करतेय असे सांगितले तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला रे.. जोपर्यत तिने सांगितले नाही तोपर्यन्त माझी पार वाट लागली होती वैभ्या, पण नशीब ताईचा आम्हाला म्हणजेच आमच्या प्रेमाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि ती योग्य वेळी आई बाबांशी पण बोलणार आहे. खुप मोठे टेंशन कमी झाले आहे रे. सागरने इत्यंभूत म्हणजेच घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर, अरे सागर हे काय बोलतोयस.. ताईने तुमच्या प्रेमाला होकार दिला की रे, तिच्याच मैत्रिणी वर तुझे प्रेम असून ही तुझ्यावर चिडली नाही आणि सपोर्ट ही करतेय म्हणजे गड्या तुझं नशीब खरंच जोरावरच आहे की रे☺️☺️. आणि कॉलेज सुरू झाल्यावर ताईला भेटायला जाण्याच्या निमित्ताने तू तिला ही भेटू शकशील की, काय बरोबर ना सागऱ्या☺️, आयला होय की वैभ्या... हे तर माझ्या पण लक्षात आले नव्हते. पुढच्याच महिन्यात त्यांचे कॉलेज सुरू होत आहे, मग काय टेन्शनच नाही म्हणत दोघांनी ही एकमेकांना टाळी देत आनंद व्यक्त केला. आणि दोघे ही घरी जाण्यास निघाले.
घरी जाता जाता सागर उद्याचा विचार करत होता, कारण ही तसे विशेषच होते, ते म्हणजे येणारा दिवस हा मंगळवार म्हणजेच एकमेकांशी फोन वरून बोलण्याचा, भेटण्याचा होता. उद्याची सगळी कामे काहीही करून सकाळीच उरकून दुपारची वेळ भावना करिता राखून ठेवायची असे मनाशीच ठरवले होते. घरी पोहचता पोहचता जवळ जवळ रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. घरी पोहचताच हातपाय धुवून जेवावयास डायनिंग चेयर वर येऊन बसला होता, त्याच्या पाठोपाठ सगळेच आले आणि जेवणाची पंगत बसली. गप्पा टप्पांच्या ओघात कधी जेवण झाले कोणालाच कळले नव्हते. जेवण झाल्यावर सागर आणि शुभदा शतपावली घेऊन आपआपल्या रूम मध्ये निघून गेले होते. सागर सकाळी लवकर उठून रानातली कामे उरकण्या करिता निघाला. रानातील सर्व कामे त्याने उरकण्याचा सपाटा लावला होता, आणि त्याने तोडलेला सर्व भाजीपाला अन केळी बाजारात व्यापाराला देऊन पैसे घेऊन घरी परतला होता. पटापट अंघोळ उरकून आई ग... लवकर जेवण दे मला बाहेर जायचे आहे असे म्हणत हॉल मध्ये बसला. शुभदा हे सारकाही पाहत होती, आणि मुद्दाम त्याला चिडवत होती, काय रे सागर... ह ह.. कोणाला.. भेटायचे आहे का रे?, कोण आहे सांग तरी मला. तसे हलक्या आवाजात सागरने काय ग ताई.. गप्प बस ना... कळले तर गडबड होईल. ए.. प्लिज ताई बघ नाहीतर न जेवता जाईन ह.. मी. असे सागर म्हणताच ☺️☺️हसतच शुभदा गप्प बसली. इकडे भावना ही आज सागर फोनवर भेटणार या आनंदात होती. दुपारी मैत्रीण सायली कडे जायचे या उद्देशाने तिने घरातली सगळी कामे उरकली होती, आणि जरा नेहमीपेक्षा आधीच जेवण्याकरिता बसली होती. जेवता जेवता तिने आईला कल्पना दिली की ती सायली कडे जाणार आहे. इकडे सागर ने भरपेट जेवण करत मित्र पवनच्या टेलिफोन बुथ कडे रवाना झाला होता. यावेळी मात्र सागर वेळेच्या आधीच तिथे हजर होता, त्याचा मित्र पवन ला ही कल्पना होती की, आज सागर भावनांशी बोलावयास येणार आहे. त्याने तसे त्याकरिता वेळ राखून ही ठेवली होती.
कथा :- नकळत सारे घडले -6
सागरला कधी एकदाचे दोन वाजतात आणि फोन करतोय असे झाले होते. इकडे भावना घरातून उशीर होऊ नये म्हणून वेळेआधीच निघाली होती. बसची वाट न बघता तिने सरळ टॅक्सी केली, पण अर्धा रस्त्यात पोहचली असता पुढे गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने ट्रॅफिक झाली होती, पुढील वाहने जागच्या जागीच थांबल्याने भावना वैतागली होती, काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. या गडबडीमुळे दोन वाजून गेले होते. सागर ने दोन वाजता भावना ची मैत्रीण सायलीच्या घरी फोन केला पलिकडून सायली ने फोन उचलला आणि सागरच आहे हे कळताच अरे सागर.. मी सायली बोलतेय अजून भावना आली नाही रे.. जरा वेळाने फोन करतोस का? असे तिने सांगता ठीक आहे सायली मी.. इथेच आहे करतो नंतर फोन असे सागर म्हणाला आणि फोन ठेवला. अडीच वाजत आले होते, त्यामुळे सागरच्या ओढीने भावना ने टॅक्सी सोडली अन त्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागली, जिथे अपघात झाला होता त्या जागी भावना पोहचली होती. खाकी वर्दीतले पोलीस अन ट्रॅफिक हवालदार यांनी जोपर्यंत ते सिलेंडर दुसऱ्या गाडीत चढवून होत नाहीत तोपर्यंत तेवढा परिसर सील केला होता. त्यामुळे भावनाने त्या गर्दीतून पलीकडे जाऊन पुढे चालत जात तिथून पुन्हा टॅक्सी पकडली. इकडे सागर ने बराच वेळ झाल्यानंतर पुन्हा फोन केला असता, सायलीने पुन्हा सांगितले नाही रे आली अजून भावना. पण ती तर वेळेच्या आधीच निघाली आहे रे,.. तिने निघण्यापूर्वी मला फोन केला होता कदाचित ती ट्रॅफिक मध्ये अडकली असावी. येईल ती.. पुन्हा थोड्या वेळाने फोन कर असे सायली म्हणाली.
सागरने ही ठीक आहे कदाचित तू म्हणतेस तसं ती ट्रॅफिक मध्ये अडकली असेल थोड्यावेळाने पुन्हा फोन करतो म्हणत त्याने फोन ठेवला. सागरच्या मित्राने (पवन) ने काय रे सागऱ्या काय झाले अजून वहिनी आल्या नाहीत का? असे विचारले असता होय रे.. अजून ती तिथे आली नाही असे सागर त्याला म्हणाला. इकडे भावना सायलीच्या बिल्डींगच्या खाली आली होती, पटकन टॅक्सी तुन पैसे देत उतरली अन सायलीच्या फ्लॅट च्या दिशेने भरभर चालू लागली. तिच्या डोर समोर येताच तिने बेल वाजवली तसे सायलीने ही पट्कन डोर ओपन केला. भावना आत मध्ये येताच अग भावना.. काय झाले?, इतका उशीर का झाला? अग दोन वेळा त्याने फोन केला पण तू नको काळजी करुस, तो पुन्हा तुला फोन करणार आहे असे सांगताच भावनाचया जीवात जीव आला होता. अग सायली काय सांगू तुला.. गॅस सिलेंडेर चा ट्रक पलटी झाल्याने अर्धा ते पाऊण तास एकाच जागी अडकून पडले होते, शेवटी त्या गर्दीतून वाट काढत कशी बशी मी पुढून टॅक्सी पकडली अन आले आहे. मला जरा पाणी देतेस का? असे भावना म्हणताच अरे हो... तुझं ऐकण्याच्या नादात मी तुला पाणी पण विचारले नाही थांब ह.. देते पाणी म्हणत सायलीने तिला पाणी आणून दिले. पाणी पीत।भावना सागरच्या फोनची वाट पाहू लागली, पण बराच वेळ होऊन ही सागरचा फोन न आल्याने तिनेच सागरने दिलेल्या नंबरवर फोन केला. पवनने फोन उचलला आणि हॅलो कोण म्हणून विचारले असता भावनाने मी भावना बोलतेय सागर आहे का? असे विचारताच त्याने सागरला इशारा करत हो हो...एकच मिनिट ह.. वहिनी देतो म्हणत सागरला त्याने फोन दिला. हाय भावना.. कशी आहेस? असे सागरने विचारता मी ना तुझ्याच आठवणीत रमलेली असते त्यामुळे मी छान आहे, आणि सॉरी रे तुला माझ्या मुळे बराच वेळ थांबावे लागले आणि झालेला सर्व प्रकार सांगितला तसे सागर ☺️ हसतच हो का?.. अग मी तर.. आयुष्य भर थांबलो असतो आणि थांबायची तयारी पण आहे सॉरी कशाला म्हणतेस असे म्हणत बराच वेळ दोघे ही गप्पा मारत बसले होते. प्रेमाच्या गप्पांच्या नादात त्यांना वेळेचे भानच उरले नव्हते. शेवटी त्यांनाच जाणीव झाली आणि एकमेकांना आय लव्ह यू 😘, मीस यू म्हणत इच्छा नसताना ही फोन ठेवले. फोन ठेवताच लाजतच काय ग.. सायली अशी का बघतेस असे भावना म्हणाली तसे ओह.. फोन वरूनच किस करावे लागले ना ग... भावना. समोर असता तर तुला अजून मजा आली असती ना😊😊 असे म्हणत तिने भावनाची मस्करी केली असता ☺️ हसतच ए.. गप्प बस... असं म्हणतात का? म्हणत दोघे ही हसल्या.
अग सायली तुला म्हणून सांगते, आमच्या मधला तो पहिला किस काय तो क्षण होता ग .. आज ही आठवला की अंगावर रोमांच उभे राहतात. हे बघ☺️ रोमांच उभे पण झाले. ए भावना सांग ना.. सांग ना मला कसे तूम्ही जवळ आलात आणि... तो पहिला किस केलात, ए मी खरच खूप आतुर झाले आहे ऐकण्या करिता. अग हो हो... सांगते जरा धीर तर धर. काय तुला सांगू सायली तो किस माझ्या आयुष्यातील पहिला वाहिला आणि रोमांचमय असा आहे. बघ..☺️☺️ बघ तुला सांगता सांगता माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. अजून ही मला असं वाटलं की मी तो किस.. अनुभवतेय. ए भावना... प्लिज सांग ना लवकर.. मी ऐकायला खुपच आतूर झाले आहे ग. हो तर ऐक मग☺️.. सागर बरोबर मी त्यांचे शेत पाहायला गेले होते तिथेच खऱ्या अर्थाने आमच्यात मैत्री झाली होती. ते पाहिल्यावर आम्ही तिथल्या एका सुंदर अशा स्पॉट वर गेलो होतो छान पैकी एन्जॉय करत असता अचानक जोराचा पाऊस आला, तिथल्या एका पडक्या घरात जे आमच्यापासून जरा लांब असल्याने जाईपर्यंत मी नखशिखान्त चिंब भिजले होते, आणि विशेष म्हणजे☺️ मी साडी नेसली होती, त्या भिजलेल्या साडीने मला स्वतःला सावरता येत नसल्याने आणि माझ्या अंगाला चिपकल्याने एका ठिकाणी मी बसले असता माझ्या पुड्यात काळीकुट्ट पाल पडल्याने तिला घाबरून मी त्याला चिंब भिजलेल्या अवस्थेत क्षणार्धात सागरला घट्ट मिठी मारली असता आम्ही अनावधाने खुपच जवळ आलो आणि कळत नकळत माझ्या ओठांना त्याच्या त्या ओठांचा पहिला स्पर्श झाला. मी माझे डोळे मिटुन घेतले अन त्याने पुन्हा तसे करावे म्हणून मी त्याच्यासमोर तशीच डोळे मिटून उभी होते. त्याने ही माझ्या ओठांना.. त्याच्या ओठांनी पुन्हा स्पर्श केला आणि माझ्या अंगावर रोमांच उभारले होते. माझा श्वास तीव्र झाला आणि जशी माझ्या हृदयाची धडधड वाढली तसे मी त्याला स्वाधीन झाले आणि कितीतरी वेळ आम्ही एकमेकांना किस करत होतो आणि आमचा आमच्या वरचा ताबा सुटून आंम्ही पूर्ण अनुभव घेतला. ए भावना.. पूर्ण म्हणजे.. काय ते पण.. आय मीन त्या गोष्टीचा पण अनुभव घेतला की काय?. ... भावनाने ही लाजतच होय सायली म्हणताच, आई शप्पथ.. कसलं भारी घडलं ना तुमच्या आयुष्यात. माझ्या पण अंगावर ऐकून रोमांच उघे राहिले ग☺️.. ए काय ग भावना.. खूप मजा येत असेल ना, होय सायली ते शब्दात नाही ग व्यक्त करता येणार. पण एक सांगते तुला, पुन्हा तो अनुभव हवा हवासा वाटतो ग. ए भावना.. माझ्या लाईफमध्ये कधी घडणार ग... हे असं सगळं. ए वेडे अस काही करू नकोस एक्ससाईटमेंट मध्ये. त्या साठी प्रियकर धोखा देणारा नसावा आणि खात्री असायला हवी आपल्या प्रियकाराबद्दल. होय ग भावना.. अशी नाही वाहवत जाणार जर मी कोणाच्या प्रेमात पडली तर☺️ ट्रस्ट मी. असे म्हणत दोघांनी ही भरपूर गप्पा मारल्या. आणि सरतेशेवटी ए सायली जे मी तुला सांगितले ते प्लिज कोणाला सांगू नकोस ह.., अग वेडे आहेस का ग?... नाही सांगणार मी कोणाला अशी सायली म्हणाली. भावना तिचा निरोप घेऊन निघाली.
इकडे सागर ने ही फोन ठेवल्यावर पवन बरोबर गप्पा मारल्या. गप्पा मारता मारता ए पवन.. मला तिची खूप आठवण येतेय रे.. मुंबई ला जावेसे वाटतेय रे. जाऊ का? अरे जा की मग, होय रे पवन पण घरी काय कारण सांगायचे?.. तो प्रश्न आहे. ए सागर मी परवा जाणार आहे बघ येणार असशील तर. होय का?पण मी आलो तर मला एखादा दिवस राहावे लागेल रे.. सांगतो तुला विचार करून असे म्हणत सागर तिथून निघाला. घरी पोहचल्यावर सागरने ताईला जाऊन ए ताई.. पवन परवा मुंबईला जाणार आहे मी पण जाऊ का? म्हणजे मला भावनाला भेटता येईल. ओह.. ☺️ माझ्या भावाला किती तीव्र ईच्छा आहे भेटायची. जा ना मग.. पण लगेच ये. होय ताई लगेच येईन पण तिला तू सांगू नकोस तिला मी सरप्राईज देणार आहे. ठीक आहे नाही सांगणार मी. थँक्स ताई.. तर मी परवा पवन सोबत जाईन. असे म्हणत सागर त्याच्या रूम मध्ये गेला. रुम मध्ये जाऊन फ्रेश होऊन परवा भावनाला भेटायचे या आनंदात होता.
भावनाला कसे सरप्राईज द्यायचे आणि दिल्यावर ती कशी रिऍक्ट होईल तसेच तिला किती आनंद होईल ☺️ तिला... काहीच सुचणार नाही या विचारानेच सागर स्वतःशी आपल्याच डोक्यात टपली मारत हसत होता. थोड्या वेळाने सर्वच खाली जेवायला आले मात्र सागर आपल्याच विचारात गुंग असल्याने जेवणाची वेळ झाली हे कळले नव्हते. आईने खालूनच जोराचा आवाज दिला, तसे सागर भानावर आला होता. येतो आई म्हणत सागर खाली आला आणि जेवायला बसला. जेवताना आई बाबा.. मी.. उद्या पवन बरोबर मुंबईला जातोय, त्याच आणि माझं ही काम आहे, काम झाले की आम्ही लगेच निघू असे म्हणता आई बाबांकडून होय ठिक आहे नीट जावा आणि या असा होकार मिळताच सागर ने ताईकडे बघत हलकेच स्माईल दिले. नित्याप्रमाणे गप्पा मारत जेवण उरकले.
उद्या रात्री निघायचे म्हणून सागरला भांगलणा करिता माणसांची जुळवा जुळवून करून त्यांच्याकडून एक दीड एकरातील शाळूतील उगवलेले तन भांगलण करून काढायचे नियोजन करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे होते. त्यामुळे सागर लवकर झोपी गेला होता. सकाळी लवकर शेतात जाऊन सागर ने शेतातली सर्व कामे उरकुन भांगलण्या करिता माणसांची जुळवाजुळव करण्या करिता गेला. बोलणी करून त्याने उद्या पासून काम सुरू करण्याकरिता सांगून पुन्हा शेताकडे निघाला अन शेतातील नेहमीच्या गड्याला दोन दिवसाच्या नियोजनाची कल्पना देऊन तोडलेला भाजीपाला आणि केळी बाजारात विकून घरी परतला होता. हे सारे करेपर्यंत दुपार उलटून गेली होती. सागरने पटकन अंघोळ करून आईला हाक मारत जेवायला दे ग... भूक लागली आहे म्हणत खाली आला होता. भूक लागल्याने जेवण वाढताच सागरने जेवणावर ताव मारायला सुरू केली असता अरे हो हो... जरा सावकाश खा.. ठसका लागेल.. असे आई म्हणाली, तसे सागर आईकडे हसत बघत सावकाश जेऊ लागला होता. जेवण होताच आपल्या रूम वर जाऊन संध्याकाळी निघायचे म्हणून दोन तीन दिवस कदाचित लागतील त्या दृष्टीकोनातून तयारी करू लागला. तयारी झाल्यावर हॉल मध्ये येऊन त्याने पवन ला फोन लावला आणि मी निघतोय झाले का तुझे? झाले नसेल तर आवर लवकर, ट्रेन गेली तर गडबड होईल, असे म्हणता अरे हो बाबा.. माझे पण होत आले आहे मी पण निघतोय.. चल ठेव.. चौकात भेटुयात म्हणत फोन ठेवला. सागरला कधी एकदाचे भावनाला भेटतोय असे झाले होते. सागरची तयारी झाल्या वर घरातील सर्वांचा निरोप घेत विशेष करून ताई जवळ जाऊन येतो ताई☺️ निघाला. ठरल्या नुसार चौकात जाऊन पवन ची वाट पाहु लागला. बराच वेळाने पवन ठरल्या जागी आला. त्याला पाहताच अरे काय हे पवन किती उशीर?... अरे बाबा माहितेय मला ☺️☺️ तुला भेटायची घाई झाली आहे ते. आपण दोन तास अशी निघतोय नाही चूकणार ट्रेन☺️ चल आता. भावा तुला नाही कळणार काय होत ते, लगा प्रेमात पड मग कळेल तुला असे म्हणत दोघे ही निघाले. कोल्हापूर स्टेशन ला पोहचताच VT चे तिकीट काढले आणि ट्रेन कधी लागते त्याची वाट पाहु लागले. पंधरा ते वीस मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म ला लागली होती. दोघांनी सोयीनुसार बोगी पकडून खिडकी जवळील सीट वर बसले. ट्रेन सुटायला वेळ असल्याने सागर काही उतरून खाण्या करिता काही जिन्नस घेऊन पुन्हा ट्रेन मध्ये येऊन बसला. ट्रेन ला सुटण्या करिता वेळ होता त्यामुळे दोघांनी ही आणलेले पदार्थ खाण्यास सुरवात केली. काही वेळातच सुरू झाली. ट्रेन स्टेशन दर स्टेशन पार करत जात होती अन तसतसे सागर ची भावनाला भेटण्याची उत्कंठा तीव्र होत होती. रात्रीचे अकरा वाजून गेले होते, पवन ला झोप आली होती सागरला सांगून पवन झोपी गेला. सागर ला मात्र झोप येत नव्हती. भावनाचया आठवणीत पहाट झाली होती, थोड्या वेळातच दादर स्टेशन येणार होते. पवन ला आवाज देऊन उठवले असता अर्ध झोपेत डोळे चोळत जांभळ्या देत उठला होता. दादर स्टेशन येता सागर आणि पवन दादरला उतरण्याच्या तयारीत होते. सागरला पहिल्यांदा आलेल्या अनुभवाने त्याने पवनला याची कल्पना दिली होती. स्टेशन येताच दोघे ही उतरले आणि पटकन त्या गर्दीतून बाजूला झाले.
0 टिप्पण्या